एलसीबीची कामगिरी,लातूरसह ठाणे जिल्ह्यातून चोरलेल्या दोन मोटारसायकली, दोन ऑटोसह दोन आरोपीला अटक.

लातूर (एल.पी.उगीले) इतर जिल्ह्यातून दुचाकी, तीन चाकी वाहने चोरायचे आणि दुसऱ्या जिल्ह्यात ती विकायची, अशा पद्धतीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराला शोधून काढून, लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत ठाणे आणि लातूर जिल्ह्यातून चोरलेल्या दोन मोटारसायकली आणि दोन ऑटो शोधून काढले असून आरोपीला अटक केली आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्या करिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .
त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 14/04/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की,मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील ओम हनुमंत कांबळे त्याने चोरलेल्या मोटारसायकली व रियर ऑटो त्याचे गौर पाटी तालुका निलंगा येथील राहते घरासमोर लपवून ठेवलेल्या आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक 14/04/2025 रोजी सदर पथक तात्काळ निलंगा तालुक्यातील गौर पाटी येथे पोचून घरासमोर थांबलेल्या ओम कांबळे याला ताब्यात घेऊन त्याने लपवून ठेवलेल्या मोटार सायकल व ऑटो संदर्भाने विचारपूस केली असता, सांगितले कि, तो व त्याचा आणखीन एक साथीदार असे मिळून सदरचे ऑटो पोलीस ठाणे शिवाजीनगर येथून एक तर ठाणे जिल्ह्यातून एक व पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीतून दोन मोटरसायकली चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून नमूद आरोपीकडून त्याने चोरलेल्या मोटरसायकल व ऑटोच्या चेसेस इंजिन क्रमांक वरून ऑटो चोरीचा एक गुन्हा पोलीस ठाणे शिवाजीनगर व एक ठाणे जिल्ह्यातील महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे दाखल असून गांधी चौक येथे एक मोटर सायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.दोन मोटारसायकल व दोन ऑटो ज्याची किंमत 2 लाख 10 हजार रुपये असा असून त्या जप्त करण्यात आले आहेत.
आरोपी नामे ओम हनुमंत कांबळे, (वय 23 वर्ष, राहणार गौर पाटी तालुका निलंगा),रोहित विष्णू क्षीरसागर, (वय 22 वर्ष, राहणार येळवट पाटी, किल्लारी तालुका औसा). यांना त्यांचे राहते ठिकाणाहून दिनांक 14 एप्रिल रोजी दुपारी 05:30 वाजता ताब्यात घेण्यात आले आहे.
नमूद आरोपींना पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, राजेश कंचे, गणेश साठे, प्रदीप स्वामी, पुठ्ठेवाड, नकुल पाटील यांनी पार पाडली.