वर्षाराणी मुस्कावाड यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

उदगीर (एल पी उगिले)
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लातूरच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुरु गौरव पुरस्कार साहित्यिका तथा शांतिनिकेतन विद्यालय कोदळी येथील सहशिक्षिका वर्षाराणी मुस्कावाड यांना प्रदान करण्यात आला.
वर्षाराणी मुस्कावाड यांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डायटच्या प्राचार्या भागीरथीताई गिरी यांच्या हस्ते लातूर येथील दयानंद महाविद्यालया च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत मुख्याध्यापक राजेंद्र भोसले, संजय यल्लावाड, कै. भाऊसाहेब देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य आशुतोष पाटील गोजेगावकर , कै. भाऊसाहेब देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी मोरे, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, मनोज पाटील, सावित्रा पाटील, सुजाता बिरादार, चिन्मय पाटील हे उपस्थित होते.
वर्षाराणी मुस्कावाड यांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला आहे.
आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी वर्षाराणी मुस्कावाड यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्या उत्कृष्ट सहशिक्षिका, सूत्रसंचालिका, गायिका, वक्त्या व लेखिका आहेत.
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वर्षाराणी मुस्कावाड यांचे अभिनंदन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सहशिक्षक विश्वनाथ मुडपे, धनंजय गुडसूरकर, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा उदगीरचे कार्यवाह प्रा. गौरव जेवळीकर, मुख्याध्यापक राजेंद्र भोसले, प्रा. धनराज बंडे, प्रा. कुमार बंडे, विवेक होळसंबरे, अंबिका पारसेवार व इतर मान्यवर आणि शांतिनिकेतन विद्यालय कोदळी येथील सहशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.