वेळीच धडा शिकवल्यास देश विघातक कृती करणारे पुन्हा डोके वर काढणार नाहीत -ह भ प प्रशांत महाराज खानापूरकर

0
वेळीच धडा शिकवल्यास देश विघातक कृती करणारे पुन्हा डोके वर काढणार नाहीत -ह भ प प्रशांत महाराज खानापूरकर

उदगीर (एल. पी. उगिले)
भारत देशामध्ये राहून देखील या देशाबद्दल प्रेम नसलेले आणि देश विघातक कृती करून राष्ट्रद्रोह करणाऱ्यां नराधमांना वेळीच धडा शिकवणे गरजेचे आहे. नाहीतर सज्जनांचे जगणे मुश्किल होईल. असे प्रतिपादन भागवताचार्य प्रशांत महाराज खानापूरकर यांनी केले.
ते उदगीर तालुक्यातील बामाजीचीवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये बोलत होते. या कथेतील चौथ्या दिवशी श्रीकृष्ण जन्म कथा सांगत असताना ते म्हणाले की, देवावर आणि देशावर प्रेम करणारा समाज निर्माण झाला पाहिजे. देवावर जेवढे प्रेम तेवढेच देशावर प्रेम असले पाहिजे. मात्र या देशांमध्ये काही नराधम लोक देशांमध्ये राहून देश विरोधी कृत्य करत आहेत. अशा नराधम लोकांमुळे देश बदनाम होत आहे. देशात राहून देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना वेळीच धडा शिकवला पाहिजे, तरच सज्जनांना जगणे सोयीचे होईल. अशा नराधमांचा बंदोबस्त झाला पाहिजे. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असेही त्यांनी सांगितले. पहेलगाम येथे झालेला भ्याड हल्ल्यांमध्ये जर धर्म विचारून गोळ्या घालण्याचे धाडस नराधम करत असतील तर हिंदुस्थान सारख्या पवित्र देशांमध्ये हिंदू सुरक्षित आहेत का? याचा विचार करावा लागेल. शासन स्तरावर यावर योग्य ती कारवाई केलीच पाहिजे. मात्र या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपणही याबाबतीमध्ये सर्वांनी समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे. देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी देशावर प्रेम केले पाहिजे. देशामध्ये होणाऱ्या आतंकवादी तथा देश विरोधी कृत्य करणाऱ्याला कोणीही प्रोत्साहन देऊ नये. गुन्हा करणारा जेवढा जबाबदार असतो तेवढाच गुन्हेगारीला सहकार्य करणारा ही जबाबदार असतो. त्यामुळे अशा कृत्याला वेळीच धडा शिकवणे ही काळाची गरज बनली आहे. पहेलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांना उपस्थित भाविकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली ही अर्पण करण्यात आली. यापुढे अशा घटना होऊ नयेत त्यासाठी शासनाच्या वतीने कठोर कारवाई व्हावी, आणि या घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीला योग्य धडा मिळाला पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. भागवत कथेतून राष्ट्रभक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीभ्रूणहत्या, जातीभेद निर्मूलन अशा अनेक सामाजिक विषयाबाबत ही प्रबोधन करण्यात आले. यावेळी बामाजीचीवाडी आणि हेर परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!