पुल आणि रस्ता तात्काळ बनवावा, सिद्धेश्वर नगर मधील नागरिकांची मागणी
पुल आणि रस्ता तात्काळ बनवावा, सिद्धेश्वर नगर मधील नागरिकांची मागणी
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 17 मधील सिद्धेश्वर नगर, महादेव मंदिर परिसरातील पूल आणि पक्क्या रस्त्याची नितांत गरज आहे. तसेच बऱ्याच महिन्यापासून नागरिकांना रहदारीसाठी रस्ता बंद करण्यात आलेला आहे.शाळेत जाण्यासाठी मुलांना पर्यायी लांबचा रस्ता वापर करावा लागत आहे .तसेच त्या प्रभागामधील बऱ्याच वर्षापासून रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असून या प्रभागांमध्ये आतापर्यंत सर्वच पुढाऱ्याने दुर्लक्ष केले आहे. तरी नागरिकांच्या आरोग्याच्या व वाहतुकीच्या दृष्टिकोनातून पूल आणि रस्ते तात्काळ मंजूर करून काम चालू करण्यात यावे. अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद यांना देण्यात आले. यावेळी उपस्थित मनसे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड,प्रहार तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे, प्रहार उपजिल्हाप्रमुख विनोद तेलंगे,प्रहार जिल्हा प्रवक्ता बंडेप्पा पडसलगे, तोडकर गोविंद माधवराव, कानमंदे महादेवी महादेव,ज्योते संजय, पत्तेवार संजय बाबुराव, शिंदे बाबुराव ज्ञानदेव, मद्रेवार ओमप्रकाश व्यंकटराव,कलाल अंकुश सूर्यकांत, चंद्रकांत व्यंकटराव पाटील,गुट्टे संजय सूर्याजी, डोईजोडे सतीश दशरथराव,डोईजोडे रेश्मा सतीश, जानते अनिता सिद्रामप्पा, श्रीमती बोधनकर पारवतबाई माधवराव, श्रीमती गायकवाड सविता विश्वनाथ, धनचकर प्रिया रोहन, श्रीमती नवसाबाई बाबुराव, श्रीमती सत्यशीला राजेंद्र बलांडे, धनश्री विद्यासागर दत्तू,होट्टे विश्वनाथ सिद्रामप्पा,धनपडवाड राम मारुती, बिरादार वैजनाथ संग्रामप्पा,कालेकर संदीप प्रकाश, कोचेवाड अंगद नर्सिंग,वाघमारे मनोहर पुंडलिक, नंदगावे शंकराप्पा गुरप्पा,कुरूळे कंटेप्पा माधप्पा,पाटील लक्ष्मण दत्तात्रेय, काशीमपुरे सुभाष माधवराव,पाटील जयश्री राजकुमार, बाराहते अरुण, दासलवार रेणुका नंदकुमार,लाळे जनक माधवराव, सताळे प्रकाश गुंडप्पा, सताळे सूर्यकांत गुंडप्पा, सताळे शिवकुमार गुंडप्पा, महेश दत्तात्रय धनशिरे, धोंडीराम इरप्पा हाडगे, संजय नरसिंग नाईक, उमाकांत दामरगीदे, अनिल मरेवाड,जयप्रकाश बेळकोने,गुरणाळे भागवत विनायकराव आदी वार्डातील नागरिकांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत. सध्या प्रशासनाचा काळ असून नागरिकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, राजकीय हेवेदावे न ठेवता शहराचा विकास करण्यावर लक्ष देऊन वार्डातील प्रश्न सोडवावे अशी मागणी प्रामुख्याने प्रहार चे तालुका अध्यक्ष रवीकिरण बेळकुंदे यांनी लावून धरली आहे.
