अफवांना बळी न पडता विकासाला मत द्या : दिलीपराव देशमुख

0
अफवांना बळी न पडता विकासाला मत द्या : दिलीपराव देशमुख

अहमदपूर (गोविंद काळे) :लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांकडे प्रचाराला कुठलाही ठोस मुद्दा ना- ही. त्यामुळे अफवा पसरवून नागरिक व मतदारांची दिशाभूल करण्याचे उद्योग केले जात आहेत. मतदारांनी अशा अफवांना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होर्णाया विकासाला मतदान करावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केले.लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारासाठी दिलीपराव देशमुख जिल्ह्यातील विविध गावात बैठका घेत आहेत. अहमदपूर तालुक्यात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. देशमुख म्हणाले की, विकास काय असतो हे आपण मागील दहा वर्ष पाहत आहोत. आश्वासने देवून केवळ भूमिपुजने न करता भूमीपुजनानंतर अवघ्या का ही दिवसात विकास कामाचे लोकापर्ण करणे ही केंद्र सरकारची कामाची पध्दत आहे. याच पध्दतीने लातूर मतदारसंघातही हजारो कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण झालेली आहेत. सामान्य जनता उघड्‌या डोळ्यांनी हा विकास पाहत आहे. यामुळेच जनतेला मोदी यांचे नेतृत्व आणि भाजपा महायुतीच्या उमेदवारावर वि- श्वास आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed