अहमदपूरात लग्न समारंभात मतदान जनजागृती
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील प्रसाद मंगल कार्यालयात उद्योजक चावरे व करडखेले परीवारातील शुभ विवाह सोहळ्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान जनजागृती करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. मंडपातील प्रतिष्ठित पाहुणे मंडळीनी मतदान करण्यासाठीचे घोषवाक्य फलक हातात घेऊन हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या पाहुण्यांना येणाऱ्या ७ मे रोजी आम्ही मतदान करणार..आपणही मतदान करावे असा संदेश दिला.यावेळी स्वीप पथकाचे प्रमुख महादेव खळुरे यांनी स्टेजवर समोर फलक धरुन आवाहन केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद तात्या हेंगणे, सामाजिक कार्यकर्ते तथा मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गोविंदराव शेळके सर, महेश अर्बन बँकेचे संचालक आशिष गुणाले, किलबिल चे संचालक ज्ञानोबा भोसले, बाळूभाऊ कासनाळे यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी, पाहुणे मंडळी आदींची उपस्थिती होती.