लातूर जिल्हा मजूर सहकारी संस्थेला अध्यक्ष जगन्नाथ पाटील गत वैभव प्राप्त करून देतील – आ. देशमुख

लातूर (एल पी उगिले) : लातूर जिल्हा मजूर सहकारी संस्था पूर्वी मोठ्या प्रमाणात गाजलेली संस्था आहे. या संस्थेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संचालक मंडळांनी बिनविरोधपणे कार्यकारिणीची निवड केली आहे. हे निश्चितच अभिमानाची बाब आहे. संचालक मंडळांनी टाकलेला विश्वास जगन्नाथ पाटील सार्थक करतील, आणि लातूर जिल्हा मजूर सहकारी संस्थेला गत वैभव प्राप्त करून देतील. असा विश्वास आहे,असे माजी पालकमंत्री तथा लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्था ही स्थानिक मजुरांच्या आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असतात. या संस्थांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मजुरांना संघटित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या कल्याणा साठी विविध उपक्रम राबविणे,रोजगार संधी निर्माण करून या संस्था स्थानिक व ग्रामीण मजुरांना बांधकाम, शेती, यांत्रिकी, जलसंधारण, रस्ते विकास, जलसिंचन इत्यादी क्षेत्रांमध्ये सामूहिक स्वरूपात काम मिळवून देतात. सामूहिक निविदांमध्ये सहभाग संस्था विविध सरकारी आणि खासगी प्रकल्पांमध्ये सामूहिक निविदा मिळवून आपल्या सदस्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात. प्रशिक्षण आणि कौशल्य विकास करण्यासाठी मजुरांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी संस्था प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करतात.सामाजिक आणि आर्थिक मदत व्हावी म्हणून संस्था सदस्यांना आर्थिक मदत, कर्ज सुविधा, विमा योजना आणि इतर सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध करून देतात. प्रशासनिक सहकार्य महाराष्ट्र राज्यातील सहकार आयुक्त कार्यालया द्वारे या संस्थांना नोंदणी, मार्गदर्शन, परिपत्रके आणि प्रशासकीय नियंत्रण दिले जाते.अडचणी आणि विकासाच्या संदर्भात अडथळे आहेत त्यावर मात करणे गरजेचे आहे.लातूर शहरातील मजूर सहकारी संस्थांना काही अडचणींचा सामना करावा लागतो, जसे की, सदस्यांचे अल्पशिक्षण आणि कौशल्याचा अभाव,अनेक सदस्य अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असून, त्यांना तांत्रिक आणि आर्थिक ज्ञानाची कमतरता आहे. संस्थांच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांची कमतरता आणि व्यवस्थापनातील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करने, संस्थांना आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी भांडवलाची कमतरता आणि कर्ज मिळवण्यातील अडचणी यासाठीही लढावे लागते. लातूर जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्था मजुरांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या संस्थांच्या माध्यमातून स्थानिक मजुरांना रोजगाराच्या संधी, प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि सामाजिक सुरक्षा मिळते. तथापि, संस्थांना काही अडचणींचा सामना करावा लागतो, ज्यासाठी शासनाच्या अधिक सहकार्याची आवश्यकता आहे.लातूर जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी संचालक मंडळ यापूर्वीच बिनविरोध निवडण्यात आले असून नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे जगन्नाथ पाटील (लातूर) व बाबासाहेव पाटील (औसा) या दोन्ही पदासाठी एकेक अर्ज आल्याने दोघांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी माळी यांनी बिनविरोध झाल्याचे घोषित केले आहे. राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली बिनविरोध निवडीची परंपरा कायम राहिली आहे. निवडी नंतर जिल्हा मजूर संघाचे नूतन अध्यक्ष जगन्नाथ पाटील व उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी आशियाना निवासस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट घेऊन शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला व आभार व्यक्त केले, यावेळी युवक काँग्रेस नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, जिल्हा मजूर सहकारी संस्थेचे नूतन अध्यक्ष जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, जिल्हा मजूर सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष तथा संचालक दिलीप पाटील नागराळकर, संचालक प्रताप शिंदे, संचालक सय्यद आसादुल्ला, प्रशांत पाटील खादर लाटवाले, विनोद आर्य, रमाकांत मुरुडकर, अरुण पाटील, नागोराव पाटील, रामराव माने, चंद्रशेखर डांगे, पार्वती आंबेकर, शिंदे संगीता यांच्यासह जिल्हा मजूर सहकारी संस्थेचे व्यवस्थापक मारुती तिकटे उपस्थित होते.याप्रसंगी लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनीही सर्व संचालक मंडळाचे कौतुक करून संस्थेच्या विकासासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले.