भारतरत्न सहकारिता पुरस्काराने भाऊसाहेब सहकारी बँक सन्मानित

भारतरत्न सहकारिता पुरस्काराने भाऊसाहेब सहकारी बँक सन्मानित
उदगीर (प्रतिनिधी) : येथील भाऊसाहेब सहकारी बँक लि. उदगीर या बँकेला भारतरत्न सहकारिता सन्मान पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच बेस्ट चेअरमन म्हणून भगवानराव पाटील तळेगावकर यांना व बेस्ट सोईओ म्हणून डॉ. लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यंदा या वर्षामध्ये बँकेस प्रथमच एका वेळी तीन पुरस्कार प्राप्त झाल्याने बँकेचे पदाधिकारी, कर्मचारी यांनी आंनद व्यक्त केला आहे. सहकार क्षेत्रामध्ये अशा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
आशिया खंडातील सहकारी बँकिंगसाठी सर्वात मोठे व्यासपीठ असलेले भारत कॉपरेटीव्ह बँकिंग समितीच्या वतीने मुंबई येथील द ललित या पंचतारांकित हॉटेलच्या सभागृहात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्कृष्ट सहकारी बँक म्हणून भाऊसाहेब सहकारी बँक लि. उदगीर, उत्कृष्ट चेअरमन म्हणून भगवानराव पाटील तळेगावकर व उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. लक्ष्मीकांत कुलकर्णी यांना पुरस्कार प्राप्त झाले. सदरचे पुरस्कार दळणवळण मंत्रालय, भारत सरकारचे उपमहासंचालक सुमनेश जोशी यांच्या हस्ते बँकेचे संचालक दिनेश पाटील, रविंद्र हसरगुंडे, उत्तरा कलबुर्गे, कोमल बिरादार व सीईओ डॉ. लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी स्विकारले.
यावेळी उपसंचालक जोशी यांनी, सध्याचे बँकिंग व्यवहार हे डिजिटल असून यामुळे बँकेस अत्यंत वेगाने गती मिळाली आहे. मात्र सायबर क्राईमची जोखीम सुध्दा प्रचंड वाढल्याने सर्वांनी सतर्कता बाळगावी असे सांगितले. भारत जगातील तंत्रज्ञानात लवकरच प्रथम क्रमांकावर असेल असेही ते यावेळी म्हणाले. बँकेस पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून बँकेचे व संचालक मंडळाचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
चौकट
बँकेने विश्वासहार्यता कमावली
भाऊसाहेब बँकेने आपल्या ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. ग्राहकांची हित जपणारी ही बँक असून बँकेस २०२४- २०२५ मधील भारतरत्न सहकारिता सन्मान पुरस्कार प्राप्त झाल्याने आंनद झाला.
भगवानराव रामचंद्रराव पाटील
चेअरमन भाऊसाहेब सहकारी बँक, उदगीर