पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केल – राहुल केंद्रे

0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केल - राहुल केंद्रे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केल - राहुल केंद्रे

उदगीर (एल पी उगिले) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतः राजसत्ता हाती घेऊन वेगवेगळे आधुनिक निर्णय घेतले, व आजच्या समाजालाही लागू होतील असे अनेक चांगले निर्णय घेतले. लोककल्याणकारी राज्य कसे असते? याचे आदर्श उदाहरण जगासमोर ठेवले. राज्यव्यवस्था कशी असावी याचं सुद्धा नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दाखवून दिले. त्यांच्या संपूर्ण आयुष्यातून आपल्याला आदर्श घेण्यासारखं खूप काही आहे. असे उद्गार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी काढले. ते उदगीर तालुक्यातील मन्ना उमरगा येथे आयोजित करण्यात आलेल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त ग्रामस्थांना उद्देशून बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,विविध देवस्थान च्या बांधकामाचे पुनरनिर्माण असो किंवा शेती साठी आवश्यक असलेली 7/12 ची नोंद ही त्यांच्याच कार्यकाळात चालू झालेली आहे.राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी , निबंध लेखन, यासारख्या विविध स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.यावेळी उदगीरचे भाजपाचे शहराध्यक्ष अमोल अनकल्ले, युवा मोर्चा अध्यक्ष भैय्या पुंड, सरपंच सरस्वती सलगर, सदाशिव केसगिरे, संतोष केसगिरे, इरषाद शेख, महेश जाधव, अर्जुन राजे, विनोद हल्लाळे, दत्ता बुर्ले, सागर बिरादार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!