रस्त्याच्या कामासाठी महिलांचे अमरण उपोषण,प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

0
रस्त्याच्या कामासाठी महिलांचे अमरण उपोषण,प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

उदगीर (एल पी उगिले) : रस्ता कामाची मंजूरी होऊन सुध्दा ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाच वर्षापासुन रस्त्याचे काम होत नसल्याने, रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे. या मागणीसाठी मलकापूर ग्रामंपचायत हद्दीतील नविन वसाहत, पांचाळ काॅलनी येथील महिला व पुरुषांनी सार्वजनिक बाधंकाम विभागाच्या कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसले होते. सदरील काम तात्काळ सुरु करण्याचे लेखी आश्वासन बांधकाम विभागाने दिल्या नंतर उपोषण मागे घेण्यात आले.
मलकापुर ग्रामंपचायत नविन वसाहत पांचाळ कॉलनी येथील जनतेनी सिमेंट रस्त्या करावे, अशी मागणी तत्कालिन मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या कडे केली असता ना.संजय बनसोडे यांनी सन 2021 मध्ये मुलभुत सुविधा अंतर्गत सिमेट रस्त्यासाठी 15 लाख रुपयाचा निंधी मंजूर केला.व या कामाचे टेंडर झाले व सदरिल टेंडर विशाल राजकुमार सताने या ठेकेदाराने 14.85% कमी दराने निविदा भरल्याने त्या ठेकेदारास कार्यारंभ आदेश 1/9/2022 रोजी दिले होते. मात्र आज तागायत सिमेंट रस्त्याचे काम केले नाही. यामुळे या भागात राहणार्‍या जनतेला त्रास होत आहे. सिमेंट रस्ता तात्काळ करावा. अशी मागणी करत या भागातील जनता ग्रांमपंचायत कडे खेटे मारत होती. परंतू सदरिल सिमेंट रस्त्याचे टेंडर निघाले असल्यांने व सदरील काम सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत होत असल्यांने ग्रांमपंचायत रस्त्याचे काम करण्याची इच्छा असुनही करु शकली नाही. माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या कडे सरपंच गुरुनाथ बिरादार यांनी पांचाळ काॅलनी येथील जनतेची रस्ता नसल्यामुळे अडचण होत असुन आपण लक्ष घालून संबधीत गुत्तेदारास तात्काळ सिमेंट रस्त्याचे काम सुरु करुन, जनतेची गैर सोय दुर करावी. अशी मागणी केली असता आ.संजय बनसोडे यांनी सा.बा. विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती डोके यांना सिमेंट रस्ता तात्काळ सुरु करण्या सुचना दिल्या. तरीही संबंधीत गुत्तेदार काम करत नसल्याने या भागातील ग्रा.प.सदस्य , महिला व नागरिकानी उदगीर येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालया समोर 28 मे रोजी अमरण उपोषणास बसले होते . प्रशासनाने उपोषणकर्त्यांची तात्काळ दखल घेऊन, कार्यकारी अभियंता श्रीमती डोके यांनी पांचाळ काॅलनी येथी सिमेंट रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने व अभियंता श्रीमती गोटे , कनिष्ठ अभियंता अलका राठोड, खंदारे यांनी लेखी पत्र दिल्याने उपोषणकर्त्यांनी अमरण उपोषण स्थगित केले. यावेळी सरपंच गुरुनाथ बिरादार,ग्रामसेवक संतोष पाटिल आदी उपस्थित होते.
या अमरण उपोषणा मध्ये ग्रामपंचायत सदस्य सतिश बिरादार, गंगाधर पवार, चेअरमन मुकेश भालेराव यांच्यासह लक्ष्मीबाइ कोठारे,लक्ष्मीबाई मुंडे, लक्ष्मीबाई पांचाळ, संगीता नागपुर्णे, हरीबाई गिरी, पदमावती घोगरे, वच्छला पाटिल, सुनिता मुसळे, विमलबाई काळे, सुनिता माने, पार्वती केंद्रे, अनुसया सुर्यवंशी, लक्ष्मीबाई चेरेकर, भागिरथी हाळे, लताबाई हंसनाळे, जयश्री दोलदापके, संगीता हालकरे, रत्नमाला फड, शालूबाई बुर्शे,अशोक बिरादार, गोविंद माने, बालाजी भांगे, संतोष पाटिल आदी सह पांचाळ कॉलनी येथील महिला, पुरुष मोठ्या संख्येने अमरण उपोषणास बसले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!