लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन विकल्या प्रकरणीउच्च न्यायालयात जामीन

0

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालयाचे न्या. श्री. मेहरोज पठाण यांनी गुन्हा रजिस्टर क्र. १८६/२०२५ विसारवाडी पोलीस स्टेशन जिल्हा नंदुरबार कलम १३७ (२), १४३, ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३, या गुन्ह्यामध्ये आरोपी किरीटभाई सुलेमानभाई वनकर यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी यांनी दिनांक १६.०६.२०२५ रोजी विसारवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, फिर्यादीची मुलगी ही “मी कुणासोबत तरी लग्न करणार आहे” अशी माहिती मैत्रिणीला देऊन गुजरात राज्यात निघून गेली, व तिला कोणीतरी अज्ञात इसमाने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले आहे. व त्यानंतर तिची विक्री केली आहे, असा आरोप पोलिसात करण्यात आला होता. आरोपी यांना पोलीस स्टेशन विसारवाडी यांनी अटक केली. आरोपींनी सत्र न्यायालय नंदुरबार येथे दोषारोप दाखल केल्यानंतर आपला जामीन अर्ज दाखल केला असता सत्र न्यायालय नंदुरबार यांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. सदर नाराजीने आरोपीने छत्रपती संभाजी नगर येथील उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी ॲड. अजिंक्य रेड्डी यांनी आरोपी तर्फे बाजू मांडताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, आरोपीवर कोणतेही प्रकारचे ठोस आरोप सदर फिर्यादीमध्ये नाहीत. फिर्यादीची मुलगी हीने गुजरात मध्ये लग्न केले. लग्न झाल्यानंतर लग्न घरी पाच दिवस राहिली, त्या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये फिर्यादीच्या मुलीने कोणत्याही प्रकारची तक्रार दिली नाही, आणि कोणत्याही प्रकारचा बेबनाव तिच्यासोबत तिच्या लग्न घरी झालेला नाही. तसेच लग्नाच्या वेळी नोटरीसमोरील शपथपत्र होत असताना फिर्यादीच्या मुलीने कोणत्याही प्रकारचा विरोध नोटरीसमोर दर्शविला नाही. फिर्यादीची मुलगी हि नर्सिंग कोर्स करत असून सुशिक्षित आहे, सज्ञान आहे. सुशिक्षित, सज्ञान व्यक्तीने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात तात्काळ दाद मागणे नैसर्गिक आहे. तथापि फिर्यादीच्या मुलीचे वर्तन हे नैसर्गिक दिसून येत नाही. म्हणून संपूर्ण फिर्याद संशयास्पद आहे. फिर्यादीची मुलगी ही पाच दिवस लग्न घरी राहिली म्हणून फिर्यादीच्या मुलीला लग्न घरी विकल्याची फिर्याद ही धादांत खोटी आहे. अशा आशयाचा युक्तिवाद ॲड. अजिंक्य रेड्डी यांनी उच्च न्यायालयासमोर मांडला. सदर युक्तिवाद मान्य करत सदर प्रकरणी युक्तिवादाअंती उच्च न्यायालयाचे न्या. मेहरोज पठाण यांनी सदर प्रकरणी दोषारोप दाखल असून फिर्यादीच्या मुलीच्या जबाबाचे अवलोकन केले असता सदर जबाबाअंती सदर जबाबामध्ये आरोपीविरोधात सबळ ठोस भूमिका दिसून येत नसल्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज मान्य केला, व जामीन मंजूर केली.
सदर प्रकरणी ॲड. अजिंक्य रेड्डी यांनी काम पहिले त्यांना ॲड विष्णू कंदे यांनी सहकार्य केलं.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!