महार वतनी जमिनीच्या संदर्भात झालेल्या उपोषणाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश

0
महार वतनी जमिनीच्या संदर्भात झालेल्या उपोषणाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर येथील महार वतनी जमिनीमध्ये काही उच्चभ्रू लोक हे पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सदरील जमीन गिळंकृत करण्याच्या तयारीत असल्या संदर्भात 20 नोव्हेंबर 2025 रोजी रीतसर अर्ज दिला होता. सदरील अर्जात स्पष्टपणे नमूद केले होते की, त्या जागेवर मूळ वारसदार हे जमिनीची साफसफाई करण्यासाठी गेले असता, त्या ठिकाणी संजय पवार व सुभाष पवार यांनी त्या ठिकाणी येऊन महार वतनी जमिनीवर असलेल्या महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत, तुम्हाला घोडे लावतो. एकेकाला जिवंत मारतो. अशी धमकी देऊन निघून गेले. त्या संदर्भात त्याच दिवशी निवेदन देऊन संबंधितांच्या विरोधामध्ये कारवाईची मागणी केली होती.
मात्र पोलीस प्रशासनाने कसलीही कारवाई केली नाही. त्या संदर्भात पुन्हा 24 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक व उपजिल्हाधिकारी उदगीर, उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची विनंती केली होती. मात्र त्याचीही दखल घेतली गेली नाही. या गोष्टीचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात यावे म्हणून 12 डिसेंबर पासून या रास्त मूळ वारसदारांनी आपल्या हक्कासाठी आमरण उपोषण सुरू केले होते.
सदरील उपोषणकर्त्याच्या मागण्यांमध्ये प्राधान्याने सर्वे नंबर 244 मधील श्रीधर राठोड आणि संजय पवार यांच्या नावे नगरपरिषद उदगीर येथील बनावट नमुना नंबर 8, घर नंबर 2- 2- 1905 रद्द करण्यात यावा, संजय पवार आणि सुभाष पवार यांची अश्लील भाषेत शिवीगाळ केल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी, सदरील प्रकरणात ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकारी मळून असल्याचे दिसून येत असल्यामुळे, त्यांचीही चौकशी करून त्यांच्यावरही योग्य कारवाई करावी, तसेच तुक्या सातू यांच्या कडपत्रकानुसार मूळ वारस यांची तपासणी करून मूळ वारसांचे फेरफार नोंद घ्यावी, असे निवेदन सादर केले होते.
त्या निवेदनाची दखल घेऊन उदगीर येथील उपविभागीय अधिकारी यांनी उदगीरचे तहसीलदार तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक यांना योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात कळवले होते. मात्र दुर्दैवाने उपविभागीय अधिकारी यांच्या दिनांक 1/ 12/ 2025 तसेच 10/12/ 2025 व 11/ 12/ 2025 या तिन्ही पत्राला वाटाण्याच्या अक्षता लावून कचराकुंडी दाखवल्याचे स्पष्ट होत आहे. या अनुषंगाने एक पत्र 24 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांनी काढले असून संबंधितांनी या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यासंदर्भात कळवले होते. परंतु सदर प्रकरणांमध्ये अद्याप काहीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. तरी आपणास पुन्हा कळविण्यात येते की, सदर प्रकरणांमध्ये संबंधित शासन निर्णय, शासन आदेश, नियम, पोट नियम इत्यादी विचारात घेऊन तात्काळ नियमानुसार आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कारवाईची प्रत या कार्यालयात सादर करण्यात यावी. विलंब करू नये. अशा पद्धतीचा आदेश उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी जारी केला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!