आदर्श तलाठी म्हणून बीड जिल्ह्यातुन विष्णू गित्ते यांची शासनाकडून निवड

आदर्श तलाठी म्हणून बीड जिल्ह्यातुन विष्णू गित्ते यांची शासनाकडून निवड

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : तालुक्यातील मौजे दादाहरी वडगाव सज्जाचे तलाठी विष्णू शामराव गित्ते (माजी सैनिक) यांची महाराष्ट्र शासनाने आदर्श तलाठी म्हणून जिल्ह्यातून निवड केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांचे मार्फत जिल्हाधिकारी बीड यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे सन 2021-22 सालासाठी बीड जिल्ह्याचे आदर्श तलाठी म्हणून निवड झाली आहे.

माजी सैनिक असलेले तलाठी विष्णू गित्ते यांच्याकडे सज्जा वडगाव दादाहारी तसेच सज्जा परळी वै व सज्जा जिरेवाडी यांचा अतिरिक्त पदभार असून ते अतिशय शिस्तप्रिय, लोकाभिमुक व कामकाजात अतिशय कार्यक्षम आहेत. महसूल प्रशासनाची अत्याधुनिक व संगणकीय कार्यप्रणाली आत्मसात करुन याबाबत सर्व तलाठी यांना मार्गदर्शन करणारे विष्णू गित्ते माजी सैनिक या प्रवर्गातून सन 2011 साली तलाठीपदी नेमणूक झाली असून ते नेहमी आपल्या कामाला सर्वोच्च प्राधन्य देत आलेले आहेत. विष्णू गित्ते यांना अगोदर परळी तालुक्यातील वडगाव दादाहारी सज्जातील पूर्ण गावांचे अतिशय जलद गतीने 100% सातबारा संगणीकरण केल्याबद्दल तसेच इतर तलाठी यांना मार्गदर्शन करून परळी तालुक्यातील सातबारा संगनिकरणात मोलाचे योगदान केल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी एम डी सिह यांनी सन 2018 मध्ये सन्मानित केले होते.

विष्णू गित्ते यांनी सन 2021 -22 या वर्षामध्ये शासनाने नेमुन दिलेले इस्टांकाप्रमाणे शासकीय वसुली, ग्रामीण व शहरी भागातील कोविड 19 विषयक सर्व कामे, तसेच परळी शहरात झालेली अतिवृष्टी बाबत कामकाज आणि शेतकर्‍यांचे अतिवृष्टी अनुदान वेळेवर वाटप करणे व इतर महत्वाची उत्कृष्ट कार्य केल्याने उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे व तहसिलदार सुरेश शेजूळ यांनी जिल्हधिकारी बीड यांच्याकडे पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवला. तो विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांचेकडून मंजूर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार हा 1 मे रोजी पोलीस ग्राउंड बीड येथे होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी बीड यांचे हस्ते देण्यात येणार आहे .बीड जिल्हा आदर्श तलाठी म्हणुन माजी सैनिक तलाठी विष्णू गित्ते यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसिलदार सुरेश शेजूळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, मंडळ अधिकारी आर. बी. कुमटकर, सौ. मंगल मुंडे, किशोर तांदळे, सूर्यवाड तसेच तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री परमेश्वर राख, परळी तालुक्यातील सर्व तलाठी ,महसूल सहायक व इतर कर्मचारी यांनी विष्णू गित्ते यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!