जन सामान्यांसाठी धावून जाणारे व्यक्तीमत्व म्हणजेच भिवा बिडगर

जन सामान्यांसाठी धावून जाणारे व्यक्तीमत्व म्हणजेच भिवा बिडगर

भिवा बिडगर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव 

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : शहरातील व तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी  त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, पेढा भरून सत्कार करण्यात आला. तसेच केक कापुन वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्विकार केला. जनतेच्या प्रश्नाची जाण असणारा आणि ते प्रश्न सोडविण्यासाठी कठिबध्द असता, जनतेच्या सुखःदुःखात धावुन जातात, जन सामान्यांसाठी धावून जाणारे व्यक्तीमत्व म्हणजेच भिवा बिडगर असे यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले आहे.

ग्रामीण भागातील सर्व परिचित असणारे बहुअयामी व्यक्तीमत्व, गरीब लोकांच्या वेळेला उभा रहाणे आणि त्यातूनच आपलं समाजकारण, करणारे दिलदार व्यक्तीमत्व म्हणजे तालुक्यातील दाऊतपूर येथील भिवा बिडगर यांच्या वाढदिवसा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान मित्र परिवाराच्या वतीने र्हदय सत्कार करण्यात आला. जीवनात प्रगतीची नवी आशा, नवा उत्साह निर्माण करणाऱ्या निस्वार्थी, कायम जनतेच्या हिताला प्राधान्य देत जनसेवेचा वारसा असलेले सदैव हसतमुख व्यक्तिमत्व भिवा बिडगर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. यावेळी सतिश मुंडे, माऊली तात्या गडदे, विकास बिडगर, सुनील कोटेचा, प्रकाश ससाणे, कमलाकर बिडगर, गोविंद सोनवणे, गोविंद मोहेकर, विश्वनाथ देवकते, दिपक कातकडे, चंद्रकांत देवकते, भास्कर नाईकवाडे, सुधाकर नाईकवाडे, व्यंकट बिडगर, रफीक भाई, अनिस शेख,सिदराम बंडेवार, समी भाई, व्हीवल मिश्रा, सुधाकर बडे, संभाजी नागरगोजे, अविनाश नागरगोजे, शफी भाई श्रीनिवास राऊत, उमेश राऊत , महादेव गित्ते, यांच्या सह इतर मित्र उपस्थित होते.

विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी  त्यांना प्रत्येक्ष भेटुन तसेच मोबाईल, एसएमएस, व्हाट्‌सअप आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. आज सकाळीपासुन रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतच होता. दरम्यान शुभेच्छा देणार्‍या सर्वांचे त्यांनी आभार मानले असुन या शुभेच्छांच्या बळावर आपण आणखी उमेदिने सामाजिक/शैक्षणिक, धार्मिक कार्य करु असे त्यांनी म्हटले आहे. वाढदिवाच्या निमित्त सत्कार प्रसंगी श्वासाच्या शेवटच्या क्षणा पर्यत मित्रांचा रुणी राहील व मिञांनी दिलेल्या शुभेच्छा कदापिही विसरणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!