महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात गौरव समारंभ संपन्न

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात गौरव समारंभ संपन्न

उदगीर (एल.पी.उगिले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयास नॅक ए प्लस मानांकन मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने प्राचार्य, नॅक समन्वयक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर व कार्यालयीन कर्मचारी, यांचा पुष्पगुच्छ व गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी होते. मंचावर उपाध्यक्ष डॉ. रेखा रेड्डी, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर, सदस्य प्रा. मनोहर पटवारी, सुभाष धनुरे ,बसवराज पाटील मलकापूरकर, ललिता पाटील, प्रशांत पेन्सलवार, प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एम. संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के ,उपप्राचार्य सी.एम.भद्रे ,पर्यवेक्षक जे.आर. कांदे, नॅक समन्वयक प्रा.डॉ.के.आर.गव्हाणे यांची उपस्थिती होती.

यावेळी चाकूरकर म्हणाले की, महाविद्यालयाला मिळालेले मानांकन सर्वांच्या कामाचा एकत्रित परिणाम आहे, संस्था सदैव आपल्या पाठीशी असून गुणवत्ता वाढ करून नवनवीन अभ्यासक्रम सुरू व्हावेत. डॉ. लखोटिया म्हणाले चांगल्या नियोजनामुळे मानांकन मिळाले, मिळालेले यश स्थिर ठेवण्यासाठी आणखी काम वाढविले पाहिजे. डॉ. रेड्डी म्हणाल्या की, मानांकनामुळे जबाबदारी वाढली असून बदलत्या काळाप्रमाणे आपणही योग्य ते बदल आत्मसात केले पाहिजेत.
प्रा.पटवारी म्हणाले, बदलत्या काळाप्रमाणे गुणवत्ता वाढवून कौशल्य अभ्यासक्रम चालू करावे लागतील. तिरुके म्हणाले सूक्ष्म नियोजन व सामूहिक प्रयत्नामुळे मानांकन प्राप्त झाले. अध्यक्षीय समारोपात मानकरी म्हणाले सर्वांच्या जिद्द ,मेहनत व तळमळीमुळे मानांकन प्राप्त झाले. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी संस्था सदैव खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे. प्रास्ताविक डॉ. बी.एम संदीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.मल्लेश झुंगास्वामी यांनी केले, तर आभार प्रा.डॉ.आर.के.मस्के यांनी केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!