जकनाळला विकासाची गंगा खेचून आणणारा नेता आ.बनसोडे – रामेश्वर बिरादार जकनाळकर

जकनाळला विकासाची गंगा खेचून आणणारा नेता आ.बनसोडे - रामेश्वर बिरादार जकनाळकर

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील जकनाळ या छोट्याशा गावात प्रत्यक्ष विकासाची गंगा खेचून आणून ग्रामस्थांनी केलेल्या मागणीपेक्षा अधिक विकास निधी उदगीरचे कार्यसम्राट आमदार संजय बनसोडे यांनी दिला आहे. एका अर्थाने संपूर्ण उदगीर विधानसभा मतदारसंघात विकासासाठी जवळपास 1700 कोटी रुपये विकास निधी खेचून आणला आहे. मतदारसंघातील प्रत्येक गाव, शहर तसेच अनेक वाडी, तांड्यावर देखील विकासाचा निधी देणारा हा पहिला आमदार पाहिल्याचे रामेश्वर बिराजदार जकनाळकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

गावातील पाणीटंचाईचा विचार करून सार्वजनिक विहिरीच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण केलेले पाणीपुरवठा केला जावा. या उद्देशाने पाच लाखाचा जलनिधी त्यांनी मंजूर केला. आता या सार्वजनिक विहिरीचे काम चालू आहे, तसेच मूलभूत विकास योजनेअंतर्गत वीस लाख रुपये विकास निधी दिला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत 58 लाख रुपये मंजूर करून या योजनेअंतर्गत पाईपलाईनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या टाकीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे.

आमदार संजय बनसोडे यांनी गेल्या वर्षी समशानभूमीला जाण्यासाठीचा रस्ता हवा म्हणून सहा लाख रुपये दिले होते. ते काम आता पूर्ण झाले आहे. मूलभूत सुविधेतून गेल्यावर्षी दहा लाख रुपये दिले होते. त्याचेही काम पूर्ण झाले आहे. मातोश्री योजनेतून आठ किलोमीटरचा रस्त्याच्या कामाला मंजुरी दिलेली असून दोन किलोमीटर पर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे. छोट्याशा गावातही विकासाची गंगा आली पाहिजे असा उदात्ते हेतू ठेवून जकनाळ येथे ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी पहिल्यांदाच आला असल्याचे ग्रामस्थ सांगत असल्याचेही रामेश्वर बिरादार जकनाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

अत्यंत दर्जेदार पद्धतीने कामे झाली पाहिजेत. असा त्यांचा अट्टाहास असतो, गावात जाणारा रस्ता आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नालीचे काम झाले पाहिजे. गावात स्वच्छता असली पाहिजे. या दृष्टीने विशेष लक्ष देऊन नागरी सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक असणारा विकास निधी आमदार म्हणून संजय बनसोडे यांनी जकनाळ या गावाला दिला आहे. भविष्यात देखील वेगवेगळ्या योजनेअंतर्गत ग्रामविकासासाठी आपण सदैव सहकार्य करू, असेही आश्वासन आमदार संजय बनसोडे यांनी दिले आहे.

आमदार संजय बनसोडे म्हणजे विकासाची गंगा खेचून आणणारा भगीरथच ! अशी भावना ग्रामीण जनतेची झाली आहे. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात आमदार संजय बनसोडे यांना साहेब किंवा आमदार असे न म्हणता प्रत्येक माणूस त्यांना “भाऊ” असे संबोधतो. अत्यंत नम्र स्वभाव, विकासाची दूरदृष्टी यामुळे आमदार संजयभाऊ बनसोडे यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचली आहे असे म्हटले तर नवल वाटू नये, अशी ही माहिती याप्रसंगी रामेश्वर बिरादार जकनाळकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. ग्रामीण विकासाची नाळ जोडणारा हा लोकनेता खरोखर सतत विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. सर्व धर्म समभाव आणि सर्व माणसाबद्दल आदरभाव हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची भावना उल्लेखनीय असल्याचेही रामेश्वर बिराजदार यांनी सांगितले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!