राष्ट्राच्या जडणघडणीत स्त्रियांची महत्त्वाची – डॉ. अनुपमा अलवाईकर

राष्ट्राच्या जडणघडणीत स्त्रियांची महत्त्वाची - डॉ. अनुपमा अलवाईकर

अहमदपूर (गोविंद काळे) : कौटुंबिक जबाबदारी पार पाडत सामाजिक भान ठेवत आपल्या मुलांवर ती चांगले संस्कार करून सामाजिक कार्यासाठी व देश सेवेसाठी चांगले नागरिक घडविण्याचे काम प्रत्येक माता करीत असते राष्ट्राच्या जडणघडणीत व विकासात स्त्रियांची महत्त्वाची भूमिका तर आहे असे प्रतिपादन हैद्राबाद येथील जीडी महाविद्यालयाच्या डॉक्टर अनुपमा अलवाईकर यांनी केले.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभागाच्या वतीने आभासी तथा दूरदृश्य प्रणाली (ऑनलाइन ) च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘महिला सशक्तीकरण वास्तव आणि अपेक्षा’ या विषयावर समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या बीजभाषण प्रसंगी डॉ. अनुपमा अलवाईकर बोलत होत्या. या चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले महाविद्यालयाच्या माजी आदर्श विद्यार्थी सौ .माधवी चौकटे (औरंगाबाद) ह्या होत्या. तर उद्घाटक म्हणून वरंगल येथील सात वाहन विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर मोहम्मद इक्बाल अली हे होते. तर विषय तज्ज्ञ म्हणून डॉ. मीनाक्षी नांदापूरकर, (हैद्राबाद) सुप्रसिद्ध लेखिका डॉ. ललिता गादगे, डॉ. माधवी कवी (पुणे) आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शोध पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात पुढे बोलताना डॉ. अनुपमा अलवाईकर म्हणाल्या की, महिलांचा विविध क्षेत्रात दर्जा सुधारणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना पुरुषाच्या बरोबरीने माणूस समजून वागणूक देणे महत्त्वाचे आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये स्त्रियांना सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉ. मीनाक्षी नांदापूरकर, डॉ. ललिता गादगे, डॉ. माधवी कवी आदींनी वेगवेगळ्या सत्रामध्ये तर या राष्ट्रीय चर्चा सत्राच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना स्त्रियांविषयी गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप सौ. माधवी चौकटे यांनी केला .

चौकट

‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’ निमित्त महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी हैदराबाद येथील प्रा. डॉ. अनुपमा अलवाईकर यांनी आपल्या बीजभाषणातून प्रखर प्रतिपादन केले.

या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाने यांनी केले तर सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ. नागराज मुळे यांनी केले. तर आभार इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. अतिश आकडे यांनी मानले. तंत्र सहाय्य डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. सचीन गर्जे व ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे यांनी केले. या राष्ट्रीय चर्चासत्रात देशातील विविध भागातून बहुसंख्य अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!