३३ व्या महाराष्ट्र राज्य किशोर-किशोरी अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२२ चा शुभारंभ !

३३ व्या महाराष्ट्र राज्य किशोर-किशोरी अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२२ चा शुभारंभ !

अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ३३ वी महाराष्ट्र राज्य किशोर – किशोरी अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२२ महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्रारंगणात आयोजित करण्यात आली आहे. आज या कबड्डी स्पर्धा निवड चाचणीचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

अहमदपूर शहरातील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक १५ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत कबड्डी स्पर्धा पार पडणार आहेत. स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद अशा विविध ठिकाणाच्या २५ किशोर गटाचे तर २५ किशोरी गटाचे संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यावेळी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे व प्रेक्षकांचे स्वागत करून आमदार बाबासाहेब पाटील यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी जाधव , विचार विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड. किशनराव बेंडकुळे, सरचिटणीस ॲड. प्रल्हादराव कदम, प्रभारी प्राचार्य डॉ. अनिताताई शिंदे, माजी सभापती शिवानंदजी हेंगणे, लातूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सांबतात्या महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजीराव रेड्डी, तालुका काँग्रेस अध्यक्ष ॲड. हेमंतराव पाटील, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, सिनेट सदस्य प्रा.विनोद माने सर, बाळुभाऊ कासनाळे, माजी सदस्य अभयभैय्या मिरकले, माजी नगरसेवक डॉ.फुजल जहागीरदार, युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, परमेश्वर सूर्यवंशी, संग्राम गायकवाड,अमितजी रेड्डी, संचालक वसंतराव फड, संचालक सुरेशराव देशमुख, युवक कार्यध्यक्ष प्रशांत भोसले, शहराध्यक्ष अजहरभाई बागवान, तानाजी राजे, इमोरज पटवेकर, फेरोज शेख, चंद्रशेखर भालेराव, अफरोज शेख, क्रीडा समीक्षक, खेळाडू, पत्रकार बांधव आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच कबड्डी असोसिएशन अध्यक्ष श्रीरंगराव बंडापल्ले, उपाध्यक्ष सोपानराव खोत, उपाध्यक्ष रविकांत आकनगिरे, शिव छत्रपती पुरस्कार विजेते सरचिटणीस प्रा.गणपतराव माने सर, कोषाध्यक्ष शंकरराव बुड्डे, सहचिटणीस धर्मपाल गायकवाड, सहचिटणीस लक्ष्मणराव सारोळे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. मनोज रेड्डी, क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक शरदराव माने आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!