प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव चे शहर अध्यक्ष बाळू आमले माळी महात्मा फुले राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव चे शहर अध्यक्ष बाळू आमले माळी महात्मा फुले राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले, प्रहार जनशक्ती पक्षाचे किनगाव शहराध्यक्ष बाळू आमले माळी यांना महात्मा फुले राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार वितरण आणि गौरव सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती मान्यवर श्री संत सावतामाळी यांचे वंशज ह भ प श्री रवीकांत महाराज वसेकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे वंशज दिलीपजी नेवसे , शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, आमदार रमेशअपा कराड, महात्मा फुले ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ माळी, सरचिटणीस उत्तम गोरे, आ. बाबासाहेब पाटील, राजुभाऊ चौगुले प्रहार जिल्हा अध्यक्ष, अभिजीत भैय्या देशमुख, संतोष भाऊ नागरगोजे, कुलदीप भैय्या सुर्यवंशी, प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव चे पदाधिकारी मोहसिन शेख,वैजनाथ सुनेवाड, युवराज आमले, शशीकांत बनसोडे, इम्रान पठाण, योगेश आमले,बालाजी पांचाळ, श्रीनिवास बनसोडे, सतीश श्रगारे, प्रकाश जोशी, गोविंद आंधळे,दशरथ हैगले, सुनिल श्रगारे, इत्यादी मान्यवर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

बाळू आमले यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान राज्यस्तरीय पुरस्काराने केल्याबद्दल, प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!