पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नाशिक महानगरपालिकेचा ‘विघ्नहर्ता उपक्रम’

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नाशिक महानगरपालिकेचा ‘विघ्नहर्ता उपक्रम’

नाशिक (दत्तू वाघ ) : आगामी गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने उत्सव काळात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिके ने मिशन विघ्नहर्ता उपक्र म हाती घेतला आहे. त्यात शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी जनजागृतीसह पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशाच्या विसर्जनासाठी विभागनिहाय फिरत्या कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव २०२१ अनुषंगाने नियोजनविषयक सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत करोनाचा संसर्ग लक्षात घेता पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी काही सूचना करण्यात आल्या.  गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्याच्या दृष्टीने शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी जनजागृती आणि प्रबोधन करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने घरीच पाण्यात अमोनिअम बायकाबरेनेट पावडर टाकून त्यामध्ये श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांना अमोनिअम बायकाबरेनेट पावडर उपलब्ध करून देणे, त्याकरिता नाशिक महानगरपालिकेमार्फत मूर्ती विक्रीच्या ठिकाणी पावडर वाटपाचे दालन उभारणे, मार्गदर्शक सूचना फलक लावणे आणि मूर्तीच्या वजनाविषयी संबंधित विक्रेत्यांनी उल्लेख करण्याविषयी सूचना देणे असे निर्णय घेण्यात आले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग राहण्यासाठी काही गोष्टींवर विशेष भर देण्यात येणार आहे. शाडू मातीची मूर्ती तयार करणे, पर्यावरणपूरक आरास करणे आणि मूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करणे, याकडे लक्ष देण्यात येणार आहे. मूर्ती विसर्जनाकरिता ऑनलाइन वेळ नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महापालिके च्या संकेतस्थळावर नोंदणी करत मूर्ती विसर्जनाकरिता ऑनलाइन वेळेची नोंदणी करणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. ऑनलाइन वेळ नोंदणीनुसार मूर्ती विसर्जन करणाऱ्यांना क्युआर कोड कार्यान्वित झाल्यानंतर महानगरपालिकेमार्फत ई प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

पर्यावरण संवर्धन आणि करोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करण्यासाठी फिरता कृत्रिम विसर्जन तलाव हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी ५० किंवा त्यापेक्षा जास्त सदनिका असलेल्या इमारती, सोसायटी, कॉलनीच्या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात प्रत्येक विभागासाठी एक याप्रमाणे सहा विभागांसाठी एकूण सहा फिरते कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांची रस्त्यावर अथवा नदीवर विसर्जन ठिकाणी गर्दी होणार नाही.

महानगरपालिका क्षेत्रात कृत्रिम तलावांसह विसर्जन ठिकाणे निश्चित करण्यात येऊन त्या ठिकाणी मूर्ती तसेच निर्माल्य संकलनाकरीता व्यवस्था करण्यात येईल. तसेच, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने आणि नदीपात्र प्रदूषित होऊ नये याकरिता मूर्ती दान करणे आणि निर्माल्य संकलित करणे याविषयी जनजागृतीसाठी विसर्जनांच्या ठिकाणी फलक लावण्यात येणार आहेत. यासाठी विविध स्वयंसेवी, शैक्षणिक आणि सामाजिक संस्था यांचे सहकार्य महापालिका घेणार आहे. महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना नागरिकांनी प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!