‘मी हे करु शकतो’ हा आत्मविश्वासच यशापर्यंत घेऊन जात असतो – निलेश गायकवाड

'मी हे करु शकतो’ हा आत्मविश्वासच यशापर्यंत घेऊन जात असतो – निलेश गायकवाड

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालय संशोधन विभागाच्या वतीने आयोजित करिअर डेव्हलपमेंट अतंर्गत आय.ए.एस.गुणवत्ता प्राप्त निलेश गायकवाड यांच्याशी संवाद साधण्यात आला. निलेश गायकवाड यांनी यु.पी.एस.सी.परीक्षेत भारतीय स्तरावर 629 वा रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. आय.आय.टी.मुंबई येथून केमिकल इंजिनीअरिग मध्ये बी.टेक.आणि एम.टेक झालेले निलेश गायकवाड बेंगलोर येथे झीनोव्ह कंन्सलटन्सी या कंपनीमध्ये सेवेत असताना ही यु.पी.एस.सी.चे ध्येय ठेवले आणि जिद्दिने अभ्यास करून हे यश संपादन केले. करीअर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत अशा गुणवंत व्यक्तीचा सत्कार करून कौतुक करण्याबरोबरच त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा या साठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ.सुनीता सांगोले यांनी प्रास्ताविक मांडताना निलेश गायकवाड यांचा परिचय करून दिला कोणत्याही स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी ध्येया प्रती अखंड ध्यास घ्यावा लागतो. परिश्रमाची पराकाष्ठा करावी लागते. निलेश गायकवाड हा जिद्दिचा प्रवास करताना निराशेचा वारा न लागू देता स्वत:च्या मनातला राजहंस जागा ठेवला सकारात्मक दृष्टीकोनातून ध्येयाप्रती चाललेल्या त्यांच्या प्रवासात कुटुंबीयांचा ही हतभार असतो. वडिल डॉ.श्रीकांत गायकवाड आणि आई डॉ.अनिता गायकवाड उभय समाजशास्त्राचे प्राध्यापक त्यामुळे समाजाशी अनुबंध राखण्याचे बाळकडू कुटुंबातच मिळाले म्हणूनच की काय एका चांगल्या पगाराच्या कंपनीच्या नोकरीत निलेश च मन लागले नाही समाजासाठी काही तर करायचे म्हणून त्यांनी यु.पी.एस.सी. करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या प्रवासाचे सुतोवाच करून डॉ. सुनीता सांगोले यांनी डॉ.अनिता गायकवाडआणि श्री. निलेश गायकवाड यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली. डॉ .अनिता गायकवाड यांनी मुलाच्या या शैक्षणिक प्रवासात त्याची जिद्द व प्रेरणा महत्वाची आहे. या काळात मित्र, स्नेही, खेळ, मनोरंजन सारे विसरुन तो एकटा अभ्यास करायचा. आजचे हे यश अनुभवताना मला खूप आनंद होतो त्याच्या या शैक्षणिक वाटचालीत आम्ही कुटुंबीया बरोबरच त्याचे शिक्षक वृंद आणि स्नेही जणांचा ही खूप मोठा हातभार आहे. त्यांच्या पाठबळामुळेच निलेश यशापर्यंत पोहोचू शकला असे मला वाटते. असे मनोगत व्यक्त करून अनिता गायकवाड यांनी या वाटचालीत डॉ. श्रीकांत गायकवाड वडील म्हणून सातत्याने मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले याबद्दलही अंतस्थ व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. शिवाजी गायकवाड यांनी निलेश गायकवाड यांच्या या यशाच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या आई-वडील कसे प्रेरक आहेत याबद्दलचा स्वतःचा अनुभवही व्यक्त केला. माझ्या स्वतःच्या जडणघडणीत सुद्धा डॉ. श्रीकांत गायकवाड यांचे योगदान आहे. त्यांच्या मुलाच्या बाबतीत तर तेच प्रेरणास्थानी होते. निलेश मराठी माध्यमातून लातूरच्या भूमीतून वडिलांच्या आईच्या शिस्तीत तयार झालेला मुलगा. अगदी मुळापासून अत्यंत सुसंस्कृत वाढलेला नीलेश लहानपणापासूनच अभ्यासू मेहनती होता हे मी स्वतः पाहिले आहे आणि म्हणूनच आजही एवढे मोठे यश मिळवून तो जमिनीवर आहे. याचे श्रेय त्यांनी कुटुंबाला दिले आणि सोबतच निलेश गायकवाड यांचे कौतुकही केले. निलेश बरोबरच त्यांचे धाकटे बंधू शैलेश यांनाही अशाच प्रकारचे यश लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करून निलेशच्या वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
निलेश गायकवाड यांनी लहानपणी आई-वडिलांनी लावलेली अभ्यासाचे शिस्त मला माझ्या भविष्यासाठी खूप उपयोगी ठरली. आधी प्रयत्नांनी आयआयटीला प्रवेश मिळवला. त्यात यशस्वी होऊन नोकरीतही लागलो पण नंतर मला प्रशासकीय सेवेचे वेध लागले म्हणून मी पुन्हा कला शाखेतील विषय घेऊन यु. पी. एस. सी. साठी तयारी करत होतो. हा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता पण आपण जेंव्हा करायचे ठरवतो तेव्हा तो तितका अवघडही नसतो. स्पर्धा परीक्षा तिचा निकाल ही गोष्ट अंदाजक्षम नसते तरीही स्वतःला त्या ध्येयाप्रती बांधून ठेवणे महत्त्वाचे असते. स्पर्धा परीक्षेतील यश अनिश्चित असले तरी ‘ मी हे करू शकतो ‘ हा आत्मविश्वास यशापर्यंत घेऊन जात असतो. म्हणून मी स्पर्धा परीक्षेत इच्छिणाऱ्यांना सांगू इच्छितो की ध्येयाप्रती अढळ विश्वास हीच यशाची पायरी असते असे मानतो. मी मराठी माध्यमातून आलो, मी ग्रामीण भागातून आलो, मला भाषेचा संकोच आहे, माझी भाषा म्हणावी तितकी विकसित नाही, आपल्यामध्ये कोणत्याही उणिवा असोत या उणिवा शोधून त्यावर मात करत आपल्याला हे ध्येय गाठायचे असते. यासाठी प्लानिंग खूप महत्त्वाचे असते आणि ते करूनच विद्यार्थी यशस्वी होऊ शकतील असे मला वाटते. निलेश गायकवाड यांनी सहज ओघवत्या भाषेमध्ये प्रामाणिकपणे आपल्या अनुभवाचे केलेली मांडणी विद्यार्थ्यांना प्रेरक ठरले प्रस्तुत कार्यक्रमाची सांगता डॉ. प्रशांत मान्नीकर यांनी निलेश गायकवाड यांच्या यशाचे कौतुक करत मान्यवरांचे आभार मानून झाली. या करिअर डेव्हलपमेंट प्रोग्राम साठी महाविद्यालयाचे ऐकायची समन्वयक प्रा.डॉ. सुनील साळुंके, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, डॉ.दिलीप नागरगोजे, डॉ. अशोक वाघमारे, डॉ. युवराज सारणीकर, प्रा. महेश जंगापल्ले, प्रा. सचिन पतंगे, श्री विकास खोगरे कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव, इतर प्राध्यापक प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. पुढेही यू ट्यूब माध्यमातून हा कार्यक्रम पाहण्यास खुला आहे .

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!