केंद्राच्या विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करू नये

केंद्राच्या विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करू नये

माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या कोट्यावधीच्या विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करून सर्वसामान्यांना किफायतशीर दरात वैद्यकीय सेवा देण्याचे धोरण राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री महादयांनी नुकतेच जाहीर केले आहे. परंतु या हॉस्पिटलचे खाजगीकरण केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळण्याऐवजी त्यांची लूटच मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे पीपीपीच्या माध्यमातून वैद्यकीय सेवांना बळकटीकरण करण्याचे कारण पुढे करून केंद्राच्या विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या राज्यातील तीन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या खाजगीरणाची निविदा तत्काळ रद्द करून सर्वसामान्य नागरिक व रूग्णांना न्याय द्यावा अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिलेला आहे.

नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,औरंगाबाद व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,लातूर येथील अतिविशेषोउपचार रूग्णालयाची देखभाल व व्यवस्थापक करण्याचे काम पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर सुरु करण्याचा घाट राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घातलेला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषण द्रव्य विभाग आणि इंटरनॅशनल फायणांन्स कार्पोरशन यांच्या सयुंक्‍त विद्यमाने वैद्यकीय शिक्षण व तृतीय आरोग्य सेवचे सार्वजनिक खाजगी भागिदीरीच्या माध्यमातून बळकटीकरण करण्यासाठी आयोजित गुंतवणूकदाराच्या मुंबईतील परीषदेत त्यांनी जाहीर केले. परंतु या माध्यमातून केलेल्या खाजगीकरणामुळे सर्वसामान्य नागरिक व रूग्णांना न्याय मिळण्याऐवजी त्यांची लूट मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे ही सुपरस्पेशालीटीच्या खाजगीकणाची निविदा तत्काळ रद्द करून सर्वसामान्य नागरिक व रूग्णांना न्याय द्यावी, अशी मागणी केंद्रिय आरोग्य मंत्री ना. मनसुख मांडवीय, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे करणार असल्याचे माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी कळविले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!