सावत्र भावाने केला आपल्याच भावाचा खुन

सावत्र भावाने केला आपल्याच भावाचा खुन

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील तळेगाव येथे नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून दि 25 एप्रिल रोजी सावत्र भावानेच भावाचा खून केल्याची घटना घडली असुन अहमदपूर पोलीसात दोन आरोपी विरूध्द खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याविषयी सविस्तर माहीती अशी की अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथे सोमवारी दि 25 एप्रिल रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घरगुती नळाला पाणी आले होते. पाणी भरताना आरोपी गणेश बाबुराव ससाने (19 वर्ष) व त्याच्या सावत्र भावाची पत्नी जयश्री ससाणे ( 27 वर्ष ) या दोघांमध्ये वाद झाला . जयश्रीचे पती व्यवसायाने खाजगी चालक असलेले नितीन बाबुराव ससाने (35 वर्ष) तासाभराने कामावरून घरी आले असता पत्नीने नळावर पाणी भरताना घडलेला प्रकार सांगीतला. रागाच्या भरात नितीन ससाने बाहेर जाऊन येतो असे सांगितले, व घराबाहेर पडले परंतु संध्याकाळी नऊच्या दरम्यान मानेवर खोलवर जखम झालेल्या अवस्थेत घरी आले व त्यांनी सांगितले की, गणेश याने सुरीने माझ्या गळ्यावर वार केला आहे.

जखमी अवस्थेतील नितीन ससाणे यास त्यांच्या पत्नीने गावकऱ्यांच्या मदतीने अहमदपुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता येथील डॉक्टरांनी मयत झाले असल्याचे सांगितले. मयताची पत्नी जयश्री ससाणे यांच्या फिर्यादीवरून सावत्र दिर गणेश ससाणे , सासरे बाबुराव ससाणे (60 वर्ष) या दोघांविरुद्ध अहमदपूर पोलिसात गुरन 195/2022 कलम 302,34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून , आरोपी गणेश ससाने फरार असून बाबुराव ससाणे यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चितंबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे करीत आहेत.

प्राथमिक तपास पोलीस उप- निरिक्षक प्रभाकर अंधोरीकर यांनी केला तर सहा-पोलीस निरिक्षक रामचंद्र केदार, पोकॉ पद्माकर पांचाळ, पोहेकॉ सुहास बेंबडे, पोकॉ परमेश्वर वागतकर, चालक पोकॉ नारायण बेंबडे, खयुम शेख, पोना ठाकरे आदींनी सहकार्य केले

जयश्री ससाणे व नितीन ससाणे एका घरात तर आरोपी गणेश ससाणे व बाबुराव ससाणे दुस-या घरात राहत होते. या दोन्ही घरात नेहमीच या ना त्या कारणांवरून वाद होत होता . मागील काळात यांचे भांडणं गावातील तंटामुक्तीकडे गेली होती. मागील काळातील भांडणाचा राग व सोमवार दि 25 मार्च रोजी नळावर पाणी भरण्यासाठी झालेली तक्रार यामुळे राग अनावर झाला विकोपातून एका जीवास मुकावे लागले. अशी माहीती सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांनी दिली

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!