संघटन बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – दिलीपराव देशमुख

संघटन बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे - दिलीपराव देशमुख

उदगीर (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षबांधणीसाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे घराघरांमध्ये आणि घरातल्या प्रत्येकाच्या मना मनामध्ये पोहोचवावी. असे विचार माजी राज्यमंत्री दीलीपराव देशमुख यांनी व्यक्त केले.

ते इंडियन काँग्रेस ब्रिगेड कमिटी च्या वतीने उदगीर येथील सहशिक्षिका तथा कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष बालिका मुळे यांची निवड प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष महिला मोर्चा म्हणून करण्यात आल्याचे पत्र बालिका मुळे यांना दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

सदरील नियुक्ती पत्रांमध्ये बालिका मुळे यांनी आज पर्यंत पक्ष संघटन बांधण्यासाठी पक्षाचे उद्देश ,ध्येयधोरणे, निष्ठा राखून जनसामान्यांमध्ये केलेल्या कार्याची दखल घेत इंडियन काँग्रेस ब्रिगेड वर्किंग कमिटीच्या माध्यमातून अखिल भारतीय काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, श्री राहुल जी गांधी यांच्या विचारांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्या सक्रियपणे करतील. या हेतूने सदरील निवड करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. इंडियन काँग्रेस ब्रिगेड कमिटी चे संस्थापक विपिन सिंह राजावत यांनी सदरील पत्र दिले आहे.
श्रीमती बालिका मुळे यांची निवड प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष महिला मोर्चा महाराष्ट्र या मोठ्या पदावर झाल्यामुळे उदगीर शहरातील सर्व शिक्षक संघटना ,काँग्रेस आघाडीतील कार्यकर्ते ,पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. बालिका मुळे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले की, पक्षाने माझ्यावर फार मोठी जबाबदारी दिली आहे. सदरील जबाबदारी पार पाडण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जिवाचे रान करू काँग्रेस पक्षातील सर्व सहकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांना सोबत घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सक्रियपणे सहभाग नोंदवून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याच्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच पक्षश्रेष्ठींचा आदेश आपल्यासाठी प्रमाण मानून आपण काम करू. असे आश्वासन दिले. याप्रसंगी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!