महात्मा फुले महाविद्यालयात डॉ.पवार यांच्या बी. आधार ग्रंथाचे प्रकाशन

महात्मा फुले महाविद्यालयात डॉ.पवार यांच्या बी. आधार ग्रंथाचे प्रकाशन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख सतीश ससाणे व किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख बळीराम पवार यांनी संयुक्तरीत्या संपादित केलेल्या बी. आधार या आंतरराष्ट्रीय शोध निबंध ग्रंथाचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील व प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी भूषविले. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील लोकसाहित्याचे ख्यातनाम अभ्यासक, संशोधक माजी प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर म्हणाले की प्राध्यापकांनी उत्तमरीत्या संशोधन केले पाहिजे संशोधन हा समाजाचा अविभाज्य घटक बनला पाहिजे. भारतीय स्त्रियांच्या समस्यांवर विविध अभ्यासकांनी लिहिलेल्या या ग्रंथातील लेखांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, अशा प्रकारच्या संशोधनातून नव्यानव्या बाबींना उजळा मिळाला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, साहित्य, समाज आणि संस्कृतीचे संशोधन ही काळाची गरज असून, नव्या दमाच्या लेखक, संशोधकांनी यासाठी पुढे आले पाहिजे आणि त्यांचे लेखन छापण्यासाठी अशा प्रकारच्या शोध निबंध ग्रंथांचे प्रकाशनही नियमितपणे झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. बी. आधार या आंतरराष्ट्रीय शोध निबंध ग्रंथाचे संपादक डॉ. सतीश ससाणे व डॉ. बळीराम पवार या संपादक द्वयांचे त्यांनी या प्रसंगी जाहीर कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मारोती कसाब यांनी केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!