बालाजी माळी यांच्या मातोश्री चे दुखद निधन
अहमदपूर : यशवंत विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक बालाजी माळी यांच्या मातोश्री काशीबाई भागवतराव माळी यांचे वयाच्या 92 व्या वर्षी अल्पशा आजाराने दि.19 रोजी मंगळवारी पहाटेच्या सुमाराला दुखद निधन झाले. दि. 19 रोजी दुपारी बारा वाजता त्यांच्या मूळ गावी धामणगाव खुर्द तालुका शिरूर अनंतपाल येथील सार्वजनिक स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पक्षात तीन मुले. चार मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असून धामणगाव चे ग्रामपंचायत सदस्य बळीराम माळी आणि यशवंत विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक बालाजी माळी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या दुखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
