नांदेड विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळतंय – रामराजे काळे

नांदेड विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळतंय - रामराजे काळे

लातूर (प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडची परीक्षा पद्धत विद्यार्थी हित लक्षात घेऊन अवलंबली गेली नाही, त्यामुळे त्याचा परिणाम BCom तृतीय वर्षाच्या लागलेल्या निकालामध्ये दिसून आला. विद्यापीठातील Bcom शाखेतील तृतीय वर्षातील 6876 विद्यार्थ्यांपैकी 3794 विद्यार्थी नापास झाले आहेत.असाच निकाल याच शाखेतील प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा लागला आहे. तृतीय वर्षातील नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येते. याबाबतची पूर्व कल्पना परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर कुलगुरू महोदय व तत्कालीन शिक्षणमंत्री उदय सामंत यांना विद्यार्थी काँग्रेस चे उपाध्यक्ष उपाध्यक्ष रामराजे काळे निवेदनाद्वारे दिली होती. परंतु कसल्याही प्रकारचा सकारात्मक विचार करून विद्यापीठाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला नाही. उर्वरित बीएस्सी, बीए, एमएससी, एमए इत्यादी व अशा अनेक कोर्सचे निकाल अशाच प्रकारे लागण्याची दाट शक्यता आहे.

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष एक, दोन विषयांमध्ये नापास झाल्यामुळे वाया जात आहे. अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी लागल्या आहेत, तर अनेक विद्यार्थ्यांना नामांकित विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षेच्या आधारावर प्रवेश मिळत आहे. परंतु नापास झाल्यामुळे विद्यार्थी मानसिक त्रासामध्ये मध्ये दिसून येत आहे,जर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तर त्याला विद्यापीठ प्रशासन शासन जबाबदार असेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या ग्रेस मार्क देऊन पास करण्याच्या सूचनेचे पालन सुद्धा विद्यापीठाकडून झाले असा संशय विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

मुंबई विद्यापीठाचे पेपर ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीने झाले, महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांच्या परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने झाल्या, पुणे विद्यापीठाने कंबाईन पासिंगचा निर्णय घेतला, परंतु नांदेड विद्यापीठ सूडबुद्धीने जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना नापास करण्याचा प्रयत्न करत आहे का काय ? असा प्रश्न आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागला आहे.

तरी मुख्यमंत्री यांनीनी यावर विचार करून, अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर नापास झालेल्या विषयांची पुनर्परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष रामराजे काळे यांनी केली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!