अण्णा भाऊ साठे यांचा संघर्ष जीवनप्रवास सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी – माजी मंत्री आ.अमित देशमुख

अण्णा भाऊ साठे यांचा संघर्ष जीवनप्रवास सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी - माजी मंत्री आ.अमित देशमुख

लातूर शहरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले विनम्र अभिवादन

लातूर (प्रतिनिधी) : अण्णा भाऊ साठे यांचे विचार, त्यांचे साहित्य, सामाजिक संघर्ष आणि जीवनप्रवास आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. लातूरच्या जडणघडणीत त्यांच्या विचाराचा पगडा राहिला आहे, त्यांच्या विचारांची जोपासणा करण्याचे काम आपण सर्वजण यापूढेही करू असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी कामगार, शोषित, उपेक्षित या समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी लिखाण करणारे साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लातूर येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेश तसेच गोरगरीब महिलांना साडी व इतर साहित्यांचे वाटप केले यावेळी ते बोलत होते.

यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख शिवाजी माने, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, चंद्रकांत चिकटे, पृथ्वीराज शिरसाठ, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती लातूरचे अध्यक्ष मिथुन गायकवाड, स्वागताध्यक्ष सुनील बसपुरे, लातूर जिल्हा काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, सुंदर पाटील कव्हेकर, अनिल शिंदे, संयोजक विकास कांबळे, अशोक देडे, कैलास कांबळे, मोहन माने, गोरोबा लोखंडे, वर्षा मस्के, आयोध्याबाई उपाध्ये, केशरबाई महापुरे, ॲड. सोनकवडे, ॲड. अंगद गायकवाड आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे विविध पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

अण्णा भाऊ साठे याच लातरात देखण स्मारक याचा आम्हाला अभिमान आहे

यावेळी पूढे बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊंचे विचार आपल्यासाठी कायम प्रेरणादायी आहेत, त्यांच्या विचारानुसार चालण्याची कायम आठवण राहावी म्हणून त्यांचा येथे पूर्णाकृती पुतळा उभारला आहे, असे नमूद करून सर्वधर्म समभावाच्या विचाराची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारे छत्रपती शाहू महाराज यांचाही पुतळ्याचे अनावरण लवकरच होणार असल्याचे यावेळी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाला समान वागणूक आणि समान संधी देण्याचे धोरण लातूर शहरात यापूर्वी जाणत्या नेत्यांनी सातत्याने राबवले आहे. भविष्यातही ती परंपरा कायम ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्या माध्यमातून,शहराचा जिल्ह्याचा समतोल विकास साधला जाईल. अण्णा भाऊ साठे यांची जयंती आपण लातूर शहरात आनंदाने साजरी करतो अण्णांचे विचार त्यांचे साहित्य, त्यांचा संघर्ष, जीवनप्रवास आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. लातूरच्या जडणघडणीत त्यांच्या विचाराचा पगडा राहिला आहे. या विचाराची जोपासना यापूढेही आपण करणार आहोत अशी ग्वाही याप्रसंगी बोलताना दिली.

लातूरची संस्कृती दिनदुबळे यांचा सन्मान राखणारी
हीच परंपरा आपण पुढे घेऊन जात आहोत

लातूरची संस्कृती दिनदुबळे यांचा सन्मान राखण्याची आहे. तीच परंपरा आपण पुढे घेऊन जात आहोत, या विधायक आणि सेवाभावी कार्यात आम्ही तुमच्या सर्वांसोबत आहोत. महाराष्ट्र सरकारने मागच्या काळात अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याचे मी सांस्कृतिक कार्य विभागाला सूचना केली होती. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा म्हणून मी मागच्या वेळी केंद्र सरकारकडे पत्र देऊन मागणी केली आहे. अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक रशियात ज्या टाऊन हॉलमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते तेथेही स्मारक करावे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक परिसराची सुशीभीकरण लातूर महानगरपालिकेने करावे, या चौकाकडे येणारे सर्व रस्ते दर्जेदार करावेत, चौक परिसरात सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, माजी खासदार लातूरचे जयवंतराव आवळे यांच्या खासदार निधीतून विवेकानंद चौक परिसरात सभागृह बांधले आहे. तेथे अण्णांच्या अनुयायांसाठी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना केल्या आहेत.

महाविकास आघाडी म्हणून येणाऱ्या निवडणुका लढवण्यास आम्ही तत्वतः तयार

लातूरमध्ये वेगवेगळया क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे कायम उभे राहतो. येथील मतदार ही नेहमीच चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे असतात. महाविकास आघाडी म्हणून लातूर महानगरपालिका व येणाऱ्या निवडणुका लढवण्यास आम्ही तत्वतः तयार आहोत असे सांगून त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना वंदन करून सर्वांना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी ॲड. अंगद सूर्यवंशी, ॲड. देविदास बोरूळे पाटील, सचिन बंडापले, महेश गायकवाड, जी.ए गायकवाड, विजयकुमार साबदे, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद, सत्तार शेख, मोहन सुरवसे, विष्णुदास धायगुडे, रमेश सूर्यवंशी, रणधीर सुरवसे, आनंद वैरागे, सुपूर्ण जगताप, राज शिरसागर, एम.पी. देशमुख, प्रा. प्रवीण कांबळे, फारुख शेख, अतिश चिकटे, आसिफ बागवान, कुणाल वागजकर, यशपाल कांबळे, मैनुद्दीन शेख, अब्दुल्ला शेख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपी साठे यांनी केले शेवटी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती लातूरच्या वतीने माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेश व साहित्य वाटप तसेच गोरगरीब गरजू महिलांना साडी वाटप प्रतिनिधीक स्वरूपात करण्यात आले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!