उपेक्षितांच्या शब्दांना धार देणारे साहित्यिक अण्णाभाऊ साठे – डॉ शरद कुमार तेलगाने

उपेक्षितांच्या शब्दांना धार देणारे साहित्यिक अण्णाभाऊ साठे - डॉ शरद कुमार तेलगाने

उदगीर (प्रतिनिधी) : तत्कालीन समाजातील उपेक्षित, शोषित, मजूर यांचा आवाज दाबणारी जी समाज यंत्रणा होती, त्या समाज यंत्रणेच्या विरोधात बंड करून आपल्या लेखणीच्या माध्यमातून जन चळवळ उभा करणारे महानायक म्हणजे अण्णाभाऊ साठे होत. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने उपेक्षितांचा आवाज बुलंद केला. तसेच सामान्य माणसांना पेटून उठायला प्रेरणा दिली. अण्णाभाऊच्या साहित्यातील प्रत्येक नायक हा पिढीत, शोषित समाजाचा घटक आहे.
त्यामुळे शोषित समाजात क्रांती घडवून आणण्याचे काम अण्णाभाऊंच्या साहित्याने केले. असे उद्गार सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार,कीर्तनकार, तज्ञ डॉक्टर शरदकुमार तेलगाने यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील समता नगर भागात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे ध्वजारोहण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका सौ. बबीता भोसले या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक नरसिंग शिंदे, माजी नगरसेवक गणेश गायकवाड, उद्धव गायकवाड, पत्रकार कसबे, कृष्णा मोटे ,बळीराम गायकवाड, दयानंद गायकवाड ,समता नगर भागातील जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ शरद कुमार तेलगाने म्हणाले की, आजचा दिवस हा क्रांती घडवून आणलेला दिवस आहे. अण्णाभाऊंच्या रूपाने या देशाला मिळालेली एक अनमोल देणगी आहे. अण्णाभाऊंच्या साहित्य रचनेमुळे जगभर त्यांची कीर्ती पसरली. समाजवादी विचारधारा स्वीकारून सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका त्यांनी सतत घेतली. शोषित, उपेक्षित मजूर यांचा जो छळ होत होता त्याच्या विरोधात अण्णाभाऊ साठे यांनी आवाज उठवला.
जगभरातून त्यांची वाहवा होऊ लागल्यानंतर भारतातील जनतेला त्यांचे मोठेपण कळाले. असेही डॉक्टर शरदकुमार तेलगाने यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती समता नगर चे अध्यक्ष शिवाजी सूर्यवंशी यांनी केले, तर आभार नरसिंग शिंदे यांनी केले.प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!