माय माऊलींच्या पाणी टंचाईचा भार कमी व्हावा म्हणून पाणीपुरवठ्याची योजना आणली – आ. संजय बनसोडे

माय माऊलींच्या पाणी टंचाईचा भार कमी व्हावा म्हणून पाणीपुरवठ्याची योजना आणली - आ. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : आजही ग्रामीण भागातील माझी माय माऊली विहीरवर, हातपंपावर जावून डोक्यावर घागर घेवुन लांबून पाणी आणत होत्या, याचीच जाणीव ठेवुन मी पाणीपुरवठा मंत्री असताना प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर पाणी द्यायचे, म्हणून आपण ‘जलजीवन मिशन’ आणली. त्याअंतर्गंत सोमनाथपुर येथे १५ कोटी रुपयाची पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केली. त्या योजनेचे उद्धाटनही झाले. लवकरच आपली पाणी टंचाई दुर होणार असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरालगत असलेल्या मौजे सोमनाथपुर येथे नवरात्र महोत्सवनिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी येथील दुर्गा देवी मंदिरात आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, सोमनाथपुरचे सरपंच राम सुर्यवंशी, कुणाल बागबंदे, रतिकांत घोगरे, मानसिंग पवार, काशिनाथ स्वामी, पप्पु डांगे, किशोर राठोड, शुभम पाटील, प्रल्हाद राठोड, बबलु पठाण, सुभाष पवार, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. संजय बनसोडे यांनी सांगितले माझ्या मतदार संघातील तरूणांच्या हाताला काम मिळावे, म्हणून एमआयडीसी मंजूर केली. त्याचेही काम लवकरच पुर्ण होवून आपल्या तालुक्यात उद्योग येतील व भविष्य काळात येथील बेरोजगारी दुर होईल. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबर आपला बौध्दीक विकास व्हावा म्हणून भविष्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन आपण करणार असल्याचेही सांगितले.
कुठलाही लोकप्रतिनिधी हा लोकांचे सेवक असतो, मालक नसतो. त्यामुळे प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली पाहिजे.
लोकप्रतिनिधीचे काम हे आपल्या भागाचा विकास करण्याचे असते. म्हणून मी जनतेचा सेवक म्हणून आपल्या मतदार संघात कोट्यावधी रूपयाचे कामे मंजूर करुन आणली आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून उदगीर तालुक्यातील सोमनाथपुर ह्या गावची ओळख जगात गेली. उदगीर शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण होत आहेत. आपल्या सर्वांच्या सोईसाठी प्रशासकीय इमारतीचे बांधकाम चालु असुन लवकरच ते आपल्या सेवेत येतील, असे सांगून विकासकामासाठी मी सदैव आपल्या सोबत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथपुरचे सरपंच राम सुर्यवंशी यांनी तर सुत्रसंचालन रतिकांत घोगरे यांनी केले. यावेळी सोमनाथपुर गावातील ग्रामस्थ व महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!