महाराष्ट्रात गोसंवर्धन आयोगाची गरज – डॉ. लखोटिया

महाराष्ट्रात गोसंवर्धन आयोगाची गरज - डॉ. लखोटिया

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्यामध्ये गोसंवर्धन आयोग निर्माण केला जावा, आणि या आयोगामार्फत वृद्ध झालेल्या गाईंची सेवा तसेच केंद्र शासनाने पारित केलेल्या गोवंश हत्या बंदी कायदा प्रभावीपणाने राबवण्यासाठी कार्य केले जावे. देशी गाईंच्या दुधापासून, दह्यापासून, तुपापासून, सेना पासून मानवी आरोग्याच्या हिताचे अनेक पदार्थ बनवले जातात. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने गोसंवर्धन आयोग स्थापन करावा. तसेच गोरक्षण करणाऱ्या संस्थांना अर्थसाह्य देऊन पाठबळ द्यावे. अशी आग्रही मागणी गोसंवर्धन प्रेमींच्या वतीने तहसीलदारांच्या मार्फत राज्य सरकारला करण्यात आली आहे. एका बाजूला आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना या देशाची संस्कृती जपणे देखील गरजेचे आहे. कृषीप्रधान देशात गोवंश अत्यंत महत्त्वाचा असून पशुधन हे शेतकऱ्यांचे खरे धन आहे. त्यामुळे त्याचे रक्षण होणे गरजेचे आहे. शेतीची यंत्रसामुग्रीच्या साह्याने मशागत करणे, सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही. तशा परिस्थितीत गोवंश टिकून राहिला तर शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय देखील चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल. त्यासाठी शासनाने गोसंवर्धन आयोग निर्माण करावा. अशी आग्रही मागणी उदगीर गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी केले आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात गोसंवर्धन आयोग महाराष्ट्रात यासाठी आवश्यक आहे की, महाराष्ट्र हे कर्नाटक, आंध्रा आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमेवर वसलेले राज्य असून गोहत्या बंदीचा कायदा असला तरीही चोरून लपून-छपून मोठ्या प्रमाणात हत्या केली जात आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आयोग गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले.या विषयाचे स्वतंत्र निवेदन देण्यात आले, सदरील निवेदनावर डॉ.लखोटीया यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बेंद्रे, महादेव नवबदे, सुबोध आंबेसंगे, रामदास जळकोटे, सतीश पाटील, अजय दंडवते, शांतिवीर मुळे, तानाजी हजारे, गणेश मुंडे, प्रशांत मांगुळकर, विश्वनाथ बिरादार, प्रा. रमाकांत महेश्वर, मोतीलाल डोईजोडे े रामभाऊ मोतीपले, प्रवीण जाहुरे, देविदास नादरगे, दीपक बलसुरकर इत्यादी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

गायीचे दूध हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी गोरक्षणाची जबाबदारी सामाजिक संस्था जरी घेत असल्या तरी त्यांना शासनाचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे. यासाठीच गोसंवर्धन आयोग स्थापन केला जावा. आणि या आयोगामार्फत संवर्धनाची कामे केली जावीत.

उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चर्च रोड भागातील एका अनोळखी व्यक्ती कडून मोटार सायकलवर पोत्यामध्ये घालून काहीतरी घेऊन जात असल्याचे पोलिसांना लक्षात आल्यानंतर संशय आल्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्या व्यक्तीला पकडले असता, चर्च रोड जवळील एका घरामध्ये तो व्यक्ती गेला. त्या ठिकाणी पोत्यामध्ये गोवांशाची चमडी असल्याचे लक्षात आले. पोलीस प्रशासनाने या व्यक्तीच्या घरी धाड टाकून गोवंशाचे 110 कातडे आढळल्याने गुन्हा नोंद केला आहे.

उदगीर शहर पोलिसात आरोपी आतिख उस्मानांचा कुरेशी याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी (सुधारणा) अधिनियम 1995 -5 क, 9अ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. पोलीस स्टेशन हद्दीतील अशा पद्धतीच्या गोवंश हत्तेच्या संदर्भात माहिती घेऊन नंबर नसलेल्या मोटरसायकल वरून एक व्यक्ती सीटवर काहीतरी पोत्यात बांधलेले घाटोढे घेऊन फिरताना आढळून आल्यामुळे त्याचा पाठलाग करून त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता त्याच्याजवळ एक लाख वीस हजाराचे चमडे पोलिसांनी जप्त केले आहे. चामडीचे सॅम्पल घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी उदगीर यांना पत्रक देऊन बोलावून घेऊन, त्यांनी सॅम्पल घेतले व चामडीही नाशवंत असल्याने त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना पत्र देऊन त्यांचे नगर परिषदेचे कर्मचारी यांना पाठवून सदरची चामडी ही टेम्पोमध्ये भरून पोलिसांनी सोमनाथपूर येथे जेसीबी मशीन ने मोठा खड्डा खोदून सदर खड्ड्यात टाकून कुजून विल्हेवाट लावली आहेत. असे असले तरीही या परिसरात हत्या केली जाते हे यावरून सिद्ध होते. या आणि अशा प्रकाराला थांबवण्यासाठी शासनाने सक्रिय राहून काम करण्यासाठी स्वतंत्र गोसंवर्धन आयोग स्थापन करावा. अशी आग्रही मागणी ही गोरक्षा समितीची आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!