निडेबन येथील विजयनगर कॉलनीतील खुल्या जागेच्या संदर्भात आयुक्तांकडून दखल

निडेबन येथील विजयनगर कॉलनीतील खुल्या जागेच्या संदर्भात आयुक्तांकडून दखल

उदगीर (एल.पी.उगीले) : मौजे निडेबन येथील विजयनगर भागातील खुली जागा आणि त्या लगतच्या रस्त्यावर गैरकायदेशीर मार्गाने काही लोक लक्ष ठेऊन आहेत,त्या मुळे ती खुली जागा सर्वसामान्य नागरिकांसाठी कायम खुली राहावी. या जागेचे नामांतर केले जाऊ नये. या दृष्टीने रणरागिणी उषाकिरण बिरादार यांनी 2002 पासून वरिष्ठ पातळीवर अर्ज फाटे केलेले आहेत. 19 सप्टेंबर 2022 रोजी ही उषाकिरण गोविंदराव बिरादार आणि इतर नागरिकांनी विजयनगर कॉलनीतील हनुमान मंदिराजवळील 74 बाय 74 ही खुली जागा आणि त्या लगतचा रस्ता हा नागरिकांसाठी खुलाच राहावा. या जागेचे नामांतर करण्याचा कट उधळून लावावा, अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे.
सदरील अर्जाची दखल घ्यावी, आणि योग्य ती कारवाई करावी. अशा पद्धतीचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना एका पत्रांमुळे कळवले आहे.
सदरील पत्रात ग्रामस्थांनी केलेल्या अर्जाची दखल घेण्याची सूचनाही केलेली आहे. विजय नगर कॉलनी येथील खुली जागा आणि त्या लगतच्या रस्त्याची जागा नागरिकांसाठी खुली राहणे आवश्यक असल्याने त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने योग्य ती कारवाई करावी. अशा सूचना औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त सुरेश बेदमूथा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला एक प्रत देऊन, योग्य ती कारवाई करण्यासाठी सुचित केले आहे. ग्रामपंचायतच्या हद्दीतील खुल्या जागेवर अनेकांच्या नजरा असून ही खुली जागा घशात घालण्यासाठी नामांतर करण्याचे प्रयत्नही चालवले असल्याची चर्चा निडेबन गावात चालू आहे. तरी योग्य ती कारवाई केली जावी, अशा पद्धतीच्या सूचना आयुक्तालयातून आल्यामुळे निडेबन येथील खुली जागा आणि रस्ता सुरक्षित राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!