देवणी नगर पंचायतीवर प्रचंड आक्रोश, डंका मोर्चा व सत्याग्रह आंदोलन

देवणी नगर पंचायतीवर प्रचंड आक्रोश, डंका मोर्चा व सत्याग्रह आंदोलन

आंदोलन कर्त्यांचा आत्मदहनाचा ईशारा
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी नगर पंचायत येथील गावठाण वाटपातील जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी नऊवर्षापासुन संर्घष सुरुच असुन सर्वे.न.२२६/२३८/१ मधील दोन हेक्टर गावठाण आरक्षित क्षेत्रातील जमिन भूखंड वाटप करण्याकरिता महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग व विभागीय आयुक्त यांनी लेखी आदेश करुन देखील नगर पंचायत देवणी यानी सदर भूखंड वाटप झालेल्या पात्र लाभार्थीना प्रत्येक्ष ताबा देण्यासंदर्भात नगर पंचायतीकडुन कायदेशीर कारवाई झाली नाही.त्या मुळे ०१ते८७लार्थीच्या मनात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांच्याकडील प्रकरण क्र .एस. एच आर.सी./एम.ए.एस./०८/२०२२/१५६९ दिनांक२२/०८/२०२२प्रकरण क्र. २१९/२०१५ ज्ञानेश्वर सुर्यवंशी विरूद्ध जिल्हाधिकारी लातुर या प्रकरणातील दिनांक ०१ऑगष्ठ २०२२ चा आदेश तसेच विभागीय आयुक्त यानी आदेश देऊनही लाभार्थ्याना जमिन भूखंडाचा ताबा आजतागायत न देता, परितक्त्या महिला, दलित,यांच्यावर अन्याय केल्याबद्दल दिनांक २३/०१/२०२३ सोमवार या दिवशी श्रमिक हक्क अभियान महाराष्ट्र संलग्न राष्ट्रीय दलित मानवी हक्क आभियानच्या वतीने प्रचंड आक्रोश, डंका मोर्चा संविधानिक पध्दतीने काढुन नगर पंचायत प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे. बेमुदत अमरण उपोषण,धरणेआंदोलन, सत्याग्रह व आत्मदहन करण्यात येणार असल्याचे निवेदन ज्ञानेश्वरभाऊ सूर्यवंशी,संस्थापक तथा राष्ट्रीय डायरेक्ट,दशरथ कांबळे जिल्हाध्यक्ष श्रमिक हक्क अभियान महाराष्ट्र,पद्माकर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते , उमाकांत कांबळे, यांनी तहसीलदार देवणी , मुख्य अघिकारी नगर पंचायत देवणी,पोलीस निरीक्षक देवणी यांना दिले आहे. तर बायनाबाई पवार,धोंडाबाई कांबळे,संध्याराणी घोरपडे ,रेखाताई कांबळे,सुमन पतंगे,शाखुबाई राणे,सुषमा कांबळे,सुरेखा चोरमल्ले ,सुमनबाई टप्पेकर, जयश्रीअंतरेड्डी,प्रभाबाई गायकवाड यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!