अहमदपुरच्या फुले महाविद्यालयात आज आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

अहमदपुरच्या फुले महाविद्यालयात आज आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने ‘वैश्विक परिदृश्यातून भारत ‘ या विषयावर आज दि. १७ फेब्रुवारी शुक्रवार रोजी एक दिवसीय आंतर विद्याशाखीय, आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या सुसज्ज सभागृहात सकाळी ठीक दहा वाजता सातवाहन विद्यापीठ, करीमनगर, तेलंगणाचे माजी कुलगुरू डॉ. मोहम्मद इकबाल अली यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे भूषविणार आहेत , तर श्री. डी. आर. झोडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी बीज भाषक म्हणून ग्वांगडोंग विद्यापीठ, चीन येथील परकीय भाषा विभागाचे प्रोफेसर डॉ. विवेक मनी त्रिपाठी हे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचा समारोप सायंकाळी ४.३० वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ.डी.एम. खंदारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापकांना कार्य रजा मंजूर केली असून जास्तीत जास्त संख्येने प्राध्यापक व संशोधकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

या परिषदेचा मुख्य विषय ‘वैश्विक परिदृश्यातून भारत ‘ हा असून वैश्विक परिदृश्यातून भारतीय साहित्य, भारतीय प्रशासन, भारतीय राजकारण, भारतीय संरक्षण, भारतीय युद्धनीती, भारतीय इतिहास, भारतीय सामाजिक सुधारणा, हवामान बदल समस्येत भारताची भूमिका, हिंदी भाषा, साहित्य और संस्कृती, इंग्लिश फॉर्म ग्लोबल प्रिस्पेक्टिव्ह, भारतीय अर्थकारण, भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान, भारतीय भूविज्ञान, भारतीय ग्रंथालय व्यवस्थापन व ग्रंथालय व्यवस्थापनाची आधुनिकीकरण तसेच भारतीय तत्त्वज्ञान, मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती, याबरोबरच वैश्विक दृष्ट्या मानवी जीवनात खेळाचे महत्त्व आदी उपविषयांवर मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषेमध्ये शोधनिबंध पाठविण्याचे तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे मुख्य निमंत्रक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, यांच्यासह आंतरराष्ट्रीय परिषदेचे संयोजक ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांनी केले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!