आर्य वैश्य समाजाच्या वतीने आ.संजय बनसोडे ‘विकास पुरुष’ पुरस्काराने सन्मानित

आर्य वैश्य समाजाच्या वतीने आ.संजय बनसोडे 'विकास पुरुष' पुरस्काराने सन्मानित

उदगीर (एल.पी.उगीले): उदगीर मतदार संघाचा गेल्या २-३ वर्षात कायापालट करुन शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधिचा निधी खेचुन आणुन सर्व घटकांचा विकास करत असुन त्यांचा विकास कामाचा धडाका सुरु आहे, म्हणुन माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांना आर्य वैश्य समाज उदगीरच्या वतीने ‘विकास पुरुष’ पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.

सदर पुरस्कार आ.बनसोडे यांना आर्य वैश्य मित्रमंडळ, उदगीर आयोजीत उपवर – उपवधु परिचय मेळाव्यात प्रदान करण्यात आला.उदगीर मतदार संघातील मागील अनेक वर्षाचा विकासाचा बॅकलॉग माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांनी भरून काढला व मतदारसंघात विकासाची गंगा आणली. मागील २ वर्षाच्या कोरोना सारख्या महामारीच्या काळातही आ.बनसोडे यांनी आपल्या मतदारसंघात तळ ठोकून होते, व आपल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत होते. या कठीण काळातही शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामासाठी दोन हजार कोटी पेक्षा जास्त निधी शासनाकडून उपलब्ध करून घेवुन मतदार संघाला प्रगतीपथावर घेवुन जात आहेत. महाराष्ट्रात मतदार संघाची नवी ओळख निर्माण केली. देशाच्या नकाशावर उदगीर शहराची एक साहित्यनगरी म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे, ती केवळ आ.बनसोडे यांच्यामुळेच! त्याच बरोबर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी ते सतत धडपडत असतात. गोर गरीब व कष्टक-यांचे नेतृत्व ते करत असुन शहरात विविध समाजासाठी भवनची निर्मिती त्यामध्ये लिंगायत भवन, बौद्ध विहार, आण्णाभाऊ साठे सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन, शासकीय विश्रामगृह, प्रशासकीय इमारत, पंचायत समितीची इमारत, तहसीलची इमारत, मुस्लीम शादीखाना, पाण्यासाठी वाटरग्रीड योजना, तिरु बँरेजेस, जळकोट उदगीर शहरात महापुरूषांचे पुतळे, मतदार संघाला जोडणारे सर्व मुख्य रस्ते, शहरातील अंतर्गंत रस्त्यासह नागरिकांना विविध मूलभूत योजना आदीसह विविध विकास कामे केली असुन असे विकास काम करणारे कार्यसम्राट लोकप्रतिनिधी मतदार संघाला भाग्याने मिळाले म्हणून आ. संजय बनसोडे यांना ” विकास पुरुष ” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी उद्योजक विजय सुरसेटवार, समाज कल्याणचे उपायुक्त डॉ. अविनाश देवशेटवार, वंदना फुटाणे, सुरेश महाजन, गोदावरी महाजन, अविनाश रायचूरकर, डॉ. तानाजी चंदावार, रमाकांत रायवाड ,टिंकू पारसेवार, नाथा कोटलवार, गोविंद देबडवार, बालाजी चन्नावार, यांच्यासह समाजाचे अध्यक्ष सचिन चन्नावार, सचिव अजय गौशटवार, कोषाध्यक्ष वैभव कोटलवार, उपाध्यक्ष अक्षय मुक्कावार, पवन पारसेवार, सहसचिव स्वप्निल गौशटवार, रोहन कोटलवार, तेजस कोटलवार, सहकोषाध्यक्ष सागर सुरशेटवार, अक्षय मलगे, श्रीनिवास रायचुरकर आदी उपस्थित होते. यावेळी आर्य वैश्व समाजातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!