जागतिक वसुंधरा दीन साजरा;नागरिकांनी पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी झाडे लावा – रेखा लांडे

जागतिक वसुंधरा दीन साजरा;नागरिकांनी पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी झाडे लावा - रेखा लांडे

वाशिम (राम जाधव) : काजळेश्वर येथे जागतिक वसुंधरा दिवस साजरा. पर्यावरण संरक्षणासाठी संपूर्ण जगभरात 22 एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो.
या दिनाचे औचित्य साधून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास तसेच भाग्योदय पर्यावरण टीमच्या वतीने वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण विषयी जनजागृती निर्माण व्हावी याकरिता हा कार्यक्रम घेण्यात आला .
पृथ्वी आणि तिच्या सभोवतालची पर्यावरणे ही आपली संपती आहे. म्हणून निसर्ग, पर्यावरण आणि वसुंधरा यांचेशी सुसंवाद,एकोपा व संगती प्रस्थापित करणे गरजेचे आहे.
वसुंधरा ही मानवी जीवन, सजीव प्रजाती आणि वसुंधरा यांचे परस्परा वलंबित्व प्रतिबिंबित करते . वसुंधरेच्या पोटात सर्व समावेशकता आहे. म्हणून निसर्गाशी बिघडलेले संबंध पुन्हा स्थापित करून जोपासणे व त्यासाठी जगभरातील लोकांना एकत्रित आणने ही आपली सामुहिक जबाबदारी आहे.
झाडे हवामान बदलाशी झुंज देण्यास सजीवांना मदत करतात. … झाडे सजीव प्रजाती नष्ट होण्यापासून वाचविण्यास मदत करतात …
झाडे स्वछ श्वसनास मदत करतात ….
झाडे समाजाला आणि त्यांच्या उपजीविकेला मदत करतात… वसुंधरा आहे म्हणून सजीव आहेत.
झाडे लावा, झाडे जगवा , निसर्ग वाचवा , पर्यावरण संतुलित ठेवा आणि पृथ्वीवरील मानवी जीवन व सजीव प्रजाती समृध्द करा …..
निसर्ग हेच खरे दैवत आहे हा संदेश देण्यात आला…
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्ये कारंजा तालुका अध्यक्ष, सचिव रेखा लांडे, भाग्योदय पर्यावरण टीमच्या पदाधिकारी शितल सावरकर, रूपाली गांवडे,आशा लांडे, राजकन्या गांवडे, ईश्वरी सावरकर, सिद्धी सावरकर व इत्यादी…

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!