टोकवाडी येथे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम

टोकवाडी येथे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम

पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे व डॉ. राजाराम मुंडे यांच्या पुढाकारातून लसीकरण मोहिमेत 570 नागरिकांचे लसीकरण

परळी वैजनाथ ( गोविंद काळे) : तालुक्यातील टोकवाडी येथे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या प्रयत्नातून तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायत टोकवाडी तसेच परळी तालुका आरोग्य विभागामार्फत आज रविवारी दि.20 जून रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या लसीकरण मोहीमेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या प्रयत्नातून पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे व डॉ. राजाराम मुंडे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळा येथे 30 वर्षांवरील नागरिकांसाठी आज सकाळी 10 ते 2 वाजताच्या दरम्यान येथे विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेचे मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
कोरोना व्हायरस कायमचा आटोक्यात आणण्यासाठी आणि नागरिकांना त्याची लागण होऊ नये म्हणून लसीकरण करण्यात येत असून याचा एक भाग म्हणून टोकवाडी येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत गावातील 570 पेक्षा जास्त नागरिकांचे कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस घेतला. तसेच आज लस न मिळू शकलेल्या नागरिकांचे लवकरच दुसऱ्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे.राज्याचे सामजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे ,नगर परिषद गटनेते वाल्मिकअण्णा कराड,आरोग्य प्रशासन यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. टोकवाडी येथील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेचा ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळाला. यावेळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, डॉ. राजाराम मुंडे, सरपंच सौ.गौदावरी राजाराम मुंडे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, नागापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास मोराळे व आदींच्या प्रमुख उपस्थिती होती. मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी टोकवाडी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामस्थांनी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!