लेकरांना बघून तृप्तीची ढेकर देते ती आई असते – प्रो. डॉ. रामकृष्ण बदने

0
लेकरांना बघून तृप्तीची ढेकर देते ती आई असते - प्रो. डॉ. रामकृष्ण बदने

उदगीर : (एल.पी.उगीले) : मातृदेव, पितृदेव, आचार्यदेव, अतिथी देवो यामध्ये प्रथम स्थानी येते ती माता, माय, जननी, आई तीच आपल्या मुलांवरती मूल्यात्मक संस्कार करत असते. समाजामध्ये सदगुणांची पेरणी करण्याचे काम आईच्याच माध्यमातून होत असते. संसारिक जीवनामध्ये सर्वजण सुखाचे सोबती असतात पण एकमेव आई अशी असते जी लेकरांना बघून तृप्तीची ढेकर देत असते, असे मत प्रो. डॉ. रामकृष्ण बदने यांनी व्यक्त केले. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहि:शाल शिक्षण केंद्र आयोजित व्याख्यानादरम्यान दुसरे पुष्प गुंफताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सताळा येथे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सचिन सुडे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के हे होते. यावेळी मंचावर शिवलिंगप्पा जळकोटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी होकरणे, शाळेचे मुख्याध्यापक संजय मळभागे, नरसिंह माळगे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. बदने म्हणाले, आईच्या संस्कारामुळेच श्यामचा साने गुरुजी झाला. अनेक महापुरुषांच्या पाठीमागे आईच असते. वृद्धाश्रमाची वाढती संख्या ही एक चिंताजनक बाब आहे. आई-वडिलांच्या सेवेतच स्वर्गसुख आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आई-वडिलांचा आदर करावा, असे आवाहन उपस्थितांना केले. अध्यक्षीय समारोप करताना रामचंद्र तिरूके म्हणाले, आई लेकरांना ज्ञानामृत पाजवीत असते, लेकरांच्या अंत:करणाचा ठाव घेत असते. त्यामुळे आई समजून घेतली पाहिजे. आईशी प्रामाणिक राहिलात तरच जीवनात यशाची शिखरे सर कराल, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी तर पाहुण्यांचा परिचय बहि:शाल शिक्षण केंद्र समन्वयक डॉ. गौरव जेवळीकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर गुरुडे यांनी तर आभार मुख्याध्यापक श्री. संजय मळभागे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!