मिडीया आमचा, आवाज कोणाचा? – मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले, मुंबई

0
मिडीया आमचा, आवाज कोणाचा? - मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले, मुंबई

मिडीया आमचा, आवाज कोणाचा? - मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले, मुंबई

लोकशाहीचा चौथास्तंभ असणारे प्रसार, प्रचारमाध्यम हे त्रेयस्त न राहता सत्ताधाऱ्यांच्या अधिपत्याखाली असणे हे लोकशाहीसाठी घातक

अहमदपूर (गोविंद काळे) : सध्या मुख्य प्रवाहातील मिडीया हा श्रीमंताचे बटीक व सत्ताधाऱ्याच्या अधिपत्याखाली असणे हे लोकशाही ला घातक असुन सामान्य माणसाचा आवाज मिडीयामधुन गायब झालेला आहे. म्हणून इतर लोकमाध्यमे फेसबुक, युट्यूब, वॉट्सअप याचाच सामान्य माणसांना आधार झालेला आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमे हे बटीक झाल्यामुळे मिडीया आमचा, आवाज कोणाचा? असा प्रश्न समोर येत असल्याचे चित्र आज समाजात दिसत आहे असे मुक्तपत्रकार शर्मिष्ठा भोसले या म्हणाल्या.
त्या अहमदपूर येथील संस्कृती गार्डनमध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व समविचारी संघटनाच्या वतीने गेल्या १८ वर्षापासून आयोजित जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना मिडीया आमचा; आवाज कुणाचा ? या विषयावर बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, निवडणूकांच्या तोंडावर अफवांचा प्रचार -प्रसार होतो. मॉडर्न तंत्रज्ञानाचा वापर करून अफवा पसरवणे, दंगलीचे मुळ सुरुवात सोशल मिडीयातील फेक मॅसेज व इडिटींग केलेल्या व्हीडीओ मधुन होतो. एका त्रयस्त संस्थेच्या संशोधनातुन २०१४ पासुन मिडीयाच्या स्वातंत्र्यात घट झाली आहे. मिडीया ओनरशिप वाढलेली असुन माध्यम स्वातंत्र्यावर गदा आली आहे. त्यात पत्रकारांना धमकावणे, महिला पत्रकारांचे चारित्र्य हणन करणे, बलात्कार व वैयक्तीक माहीती सार्वजनिक करण्याची धमकीही दिली जाते. फेसबुक, ट्विटर, वॉट्स अप, युट्यूब अशा सोशल मिडीयावरील अकौंटवर कार्यवाही करून ती बंद केली जातात. खरी माहीती जनतेला दिली जाऊ देत नाहीत जात, धर्म, वर्ण, पुरुषी संस्कृती या बाबींना अधिक महत्व दिले जात आहे म्हणून त्यास सोशल मिडीयाशी समसमान असलेला पॅरलल मिडीया जनतेचा आवाज बनत आहे. समाजाने माध्यमा विषयी साक्षर बनने गरजेचे आहे. फेक न्युज ओळखता येणे व तसेच माहीतीची सत्यता पडताळता येणे काळाची गरज आहे. निवडणूकांच्या तोंडावर सजग मतदार बनणे गरजेचे आहे.
मिडीया आमचा आणी आवाजही जनतेचाच हवा असेल तर आपल्या येणाऱ्या पिढीला मेडीकल, इंजिनिअरींग तसेच इतर ग्लॅमरस साईड सोडून पत्रकारीता / मिडीया क्षेत्रात उतरणे नितांत गरजेचे असल्याचेही श्रीमती भोसले म्हणाल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सत्यनारायण काळे, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गोविंदराव शेळके यांच्यासह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, महिला आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर लांडगे, सुत्रसंचलन रमाकांत टेकाळे व शिंदे, व्याख्यातेचा परिचय जि.प. शिक्षिका जयश्री पवार यांनी तर आभार साधना लोहकरे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!