कोरोना काळात निर्बंधाचा अतिरेक नको – निवृत्ती सांगवे ( सोनकांबळे )

कोरोना काळात निर्बंधाचा अतिरेक नको - निवृत्ती सांगवे ( सोनकांबळे )

उदगीर (एल. पी. उगिले) : कोरोनाच्या नावाने सततचा लॉकडाऊन मुळे मध्यमवर्गीयांना जगणे कठीण होऊन बसले आहे. सतत व्यापार बंद असल्याने लघु उद्योग करणाऱ्या व्यापाऱ्यांनी, उद्योजकांनी बँकांचे कर्ज काढून  उद्योग सुरू केले आहेत. तसेच उद्योगाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या ठिकाणी बाजार भावाने दुकाने भाड्याने घेतले आहेत. ते भाडे कसे द्यायचे? आणि उदरनिर्वाह कसा चालवायचा? अशा दुहेरी चक्रव्यूहामध्ये मध्यमवर्गीय सापडला आहे. त्यासाठी अतिकडक निर्बंध नकोत. अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे यांनी व्यक्त केली आहे.

 उपासमारीने मारण्याची वेळ आलेला मध्यमवर्गीय समाज घरी बसून खाणार काय? हा मोठा प्रश्न आहे. जे खुप गोरगरीब आहेत, त्यांना समाजातील श्रीमंत लोक आणि सरकारकडून देखील थोड्याफार प्रमाणात मदत मिळत आहे. मात्र मध्यमवर्गीयांची अवस्था अत्यंत बिकट आहे.” बाप भीक मागू देईना आणि आई जेवू घालीना” अशी अवघड अवस्था निर्माण झाली आहे. दुकानासाठी, उद्योगासाठी काढलेल्या कर्ज आता दुप्पट होऊ लागलली आहेत. त्याची चिंता एका बाजूला तर दुसर्‍या बाजूला दैनंदिन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जे श्रीमंत किंवा नोकरदार लॉकडाऊनचे  निर्बंध खडक करा असे म्हणत आहेत, त्या मुठभर लोकांसाठी हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना पाय खोरून मारायला लावणार का? असा प्रश्नही निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी उपस्थित केला आहे.

 शेतकऱ्यांचे हजार प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. तशातच बाजारपेठा बंद झाल्याने कामगार  मजुरांचे आजचे काम गेले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या जगण्याला आधार कोण देणार? कोरोना हा कायम असून आपण कोरोणा सोबत जगले पाहिजे,असे सुरूवातिला सांगितले गेले. मात्र सततच्या लाॅकडाऊन मुळे “रोग परवडला, उपचार नको “असे म्हणायची गरिबावर वेळ आली आहे. तसेच मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांनी दुकान उघडले, 2ते4 मिनिटे मागेपुढे झाले तर लगेच प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाऊ लागला आहे!साहेब व्यापारी हे चोर नाहीत किंवा गुन्हेगारी नाहीत.त्यांचे प्रश्न समजुन घ्या. त्यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार होणे गरजेचे आहे. दुकानाचे भाडे कुठून द्यायचे? बँकांचे कर्ज कुठून फेडायचे? आणि घरखर्च कसा चालवायचा? असे अनेक प्रश्न त्या लोकांसमोर आहेत.

 त्यामुळे त्यांच्यासोबत माणुसकीने व्यवहार करा.प्रत्येकवेळी बडगा उगारून प्रश्न मिटत नसतात.त्या मुळे व्यापारु,हातगाडीवाले,ठेलेवाले यांना थोडी सवलत द्या, अशी ही विनंती निवृत्तीराव सांगवे  (सोनकांबळे) यांनी प्रशासनाला केली आहे. प्रशासनाने अशीच कठोर भूमिका घेतली तर पोटाची आग बुजवण्यासाठी गोरगरीबांना नाइलाज म्हणुन रस्त्यावर उतरावे लागेल. असा इशाराही निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी दिला आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!