विकास निधी कमी पडणार नाही….चंदन पाटील नागराळकर

विकास निधी कमी पडणार नाही….चंदन पाटील नागराळकर

निडेबन क्रांती नगर येथे पाईपलाईन कामाचे उद्घाटन

उदगीर ( एल.पी.उगीले ) : उदगीर शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या निडेबन ग्रामपंचायतीची झपाट्याने वाढ होत असून गावातील प्रत्येक वॉर्डातील लोकांना पाणी, रस्ते, पथदिवे यांचा त्रास होऊ नये म्हणून आमदार , खासदार, 15 वित्त आयोग अशा विविध लोकप्रतिनिधीं  यांच्या फंडातून निधी खेचून आणून विविध योजने मधून  विकास कामे कामे अवघ्या पाच महिन्याच्या आत काही मूलभूत सुविधेचे कामे पूर्ण तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. निडेबन गावाच्या प्रथम नागरिक  सरपंच जयश्री बेल्लाळे व उपसरपंच आत्तार फय्याज (पप्पू भाई )यांच्यासह सर्व सन्माननीय सदस्य हे लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा करून लाखो रुपये निधी खेचून आणून निडेबन गावाचा चेहरामोहरा बदलत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सरपंच, उपसरपंच ,सर्व सदस्य व कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी श्री बी. जी बिरादार या सर्वांच्या एकमताने विविध विकास कामे चालू आहेत.त्याचाच एक भाग म्हणून क्रांतीनगर निडेबन येथे राष्ट्रवादी काँग्रेसची युवकांची बुलंद तोफ चंदन पाटील नागराळकर यांच्या शुभहस्ते 15 व्या वित्त आयोगातून पाईपलाईनचच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच आत्तार फय्याज( पप्पू भाई), मनोज बेल्लाळे, माजी उपसरपंच व मार्गदर्शक सुनील सोमवंशी, शिंदे दशरथ, मनियार फशी,पी. डी पाटील,संदीप अनंतवाळ, श्रीकांत जानते, फशीभाई मिर्झा, धिरज रेड्डी यांच्यासह क्रांती नगरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी नागरिकांशी संवाद साधतांना चंदन पाटील यांनी सांगितले की,उदगीरच्या विकासासाठी आता निधी कमी पडणार नाही.बनसोडे साहेब विकासाची गंगा खेचून आणतील असा विश्वास व्यक्त केला.

 विविध वार्डात नागरिकांच्या मुलभूत समस्या सोडवल्या जात असून नागरिकांमधून सर्व निडेबन ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक, उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!