संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत रेणापुरात शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक

संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत रेणापुरात शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक

शिवसैनिकांनी संकट काळात जनतेला आधार द्यावा- संपर्क प्रमुख संजय मोरे

रेणापूर (प्रतिनिधी) : शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांच्या उपस्थितीत रेणापूर येथे शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. सध्या कोरोनाचे संकट असून शिवसैनिकांनी या काळात जनतेला आधार द्यावा,अधिकाधिक लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन मोरे यांनी या बैठकीत बोलताना केले. संपर्कप्रमुख मोरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता रेणापूर येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक घेण्यात आली. नवनिर्वाचित लातूर ग्रामीण जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, लातूर शहर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने,माजी जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या तथा जिल्हा महिला संघटक सौ. सुनिता चाळक, उपजिल्हाप्रमुख सचिन दाने, लातूर तालुकाप्रमुख ॲड. प्रवीण मगर, रेणापूर शहर प्रमुख गणपत कोल्हे यांची या बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी यावेळी रेणापूर नगरपंचायतची प्रभागनिहाय माहिती संपर्क प्रमुखांना सादर केली.
यावेळी बोलताना संपर्कप्रमुख मोरे म्हणाले की, आगामी नगरपंचायत निवडणूक लक्षात घेता बूथ पातळीवर कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यासाठी काम करण्याची गरज आहे. पदाधिकाऱ्यांनी त्यावर भर दिला पाहिजे.हे काम गतीने व्हावे यासाठी दाधिकार्‍यांच्या निवडी लवकर होणे आवश्यक असून जिल्हाप्रमुखांसोबत चर्चा करून त्या लवकरात लवकर केल्या जाव्यात, असे आदेशही त्यांनी दिले.
संपर्क प्रमुख मोरे म्हणाले की, पक्ष नव्हे तर संघटना म्हणून शिवसैनिकांनी एकदिलाने काम केले पाहिजे. शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागले पाहिजे.जनता आपल्यासाठी नाही तर आपण जनतेसाठी आहोत याचे भान ठेवून कार्यकर्त्यांनी काम करणे आवश्यक आहे. रेणापूर शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी ठाकरे सरकार कटिबद्ध आहे. आगामी निवडणुकीच्या माध्यमातून रेणापूरकरांनी शिवसेनेला सेवा करण्याची संधी द्यावी. यासाठी तळागाळातील जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी अग्रस्थानी रहावे.कोरोना काळात अधिकाधिक लसीकरण करून घ्यावे,असे आवाहनही त्यांनी केले.
या दौऱ्यात संपर्कप्रमुख मोरे यांनी रेणुकामातेची पूजा केली.पाऊस पाणी चांगले व्हावे,शेतकरी सुखी रहावा, कोरोना संकटातून लवकर मुक्तता व्हावी,यासाठी रेणुकामातेला साकडे घातले. प्रारंभी लातूर ग्रामीण शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन संपर्क प्रमुखांचा सत्कार केला.या बैठकीस अनिल फुलारी, बालाजी कागले, सुधाकर गरड, हणमंत जाधव, चांदपाशा शेख, शंकर कसपटे, कपिल चितपल्ले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!