महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण – निवृत्ती सांगवे (सोनकांबळे)

महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण - निवृत्ती सांगवे (सोनकांबळे)

 उदगीर (एल.पी. उगिले) : केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोलियम पदार्थांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.इतर इंधन दरवाढीच्या सोबत घरगुती गॅसच्या किमती मध्ये होत जाणारी वाढ ही गृहिणीचे बजेट कोलमडून टाकायला कारणीभूत ठरते आहे. सर्वच क्षेत्रात महागाई वाढत असून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती देखील आता गरिबांना परवडत नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे, गोरगरिबांचे जगणे कठीण झाले आहे. शासनाने वेळीच याचा विचार नाही केलास, राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या वतीने आंदोलन छेडावे लागेल. असा इशारा राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी दिला आहे.

 सध्या डिझेल शंभरच्या जवळ आहे. तर पेट्रोलने शंभरी पार केलेली आहे. गॅसचा दर ही दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो आहे. एका बाजूला अच्छे दिन म्हणून अशा दाखवून उज्वला गॅसच्या नावाने गॅस दिला खरा, मात्र आता किमती प्रचंड वाढल्यामुळे रिफील करणे शक्य नसल्याने गोरगरीब महिलांनी पुन्हा जळतन, लाकूड, गवऱ्या शोधायला सुरुवात केली आहे. धूर मुक्त घर या संकल्पनेला पूर्णपणे कोलदांडा बसला आहे.

 अच्छे दिनचे गाजर दाखवून गरिबांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधामध्ये जनमत तयार होत आहे. लोकांना महागाईच्या खाईत लोटून टाकले जात आहे. अशीही टीका निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे)यांनी केली आहे. मध्यमवर्गीय जनतेला दुचाकीवरून फिरणे देखील परवडत नाही आहे. त्यामुळे कामाच्या गतीला मर्यादा येऊ लागल्या आहेत. अगोदरच कोरोना महामारीच्या कारणाने लॉक डाऊन मध्ये मध्यम वर्गीय होरपळून निघाले आहेत. आणि आता पुन्हा महागाईचा भस्मासुर निर्माण केला जात असल्याने जनतेने जगावे की मरावे? असा प्रश्न पडू लागला आहे. शासनाने त्वरित महागाई कमी करावी. अन्यथा येणाऱ्या काळात जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असेही निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी यावेळी स्पष्ट केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!