ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने नागझरी येथे वृक्षारोपण

ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने नागझरी येथे वृक्षारोपण

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील जि. प. शाळा नागझरी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे प्रथम नागरीक सरपंच रामकिशन सूर्यवंशी होते तर प्रमुख म्हणुन उप जिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, जि.प.सदस्य माधवराव जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना गावचे उपसरपंच उध्दव ईप्पर म्हणाले की शाळेच्या रोड पासून गावापर्यंत रोडचे दोन्ही बाजूने, जि. प. मैदान, स्मशान भूमी येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. गावात पाणी नाही कायम स्वरुपी पाण्याची सोय व्हावी, गावात वृध्द, विधवा, निराधार यांना पेंशनचा लाभ भेटावा. गावामध्ये घरकुलांचे जास्तीत जास्त लाभ धारक यांना वाटप व्हावे. अश्या गावातील अनेक समस्या कडे लक्ष वेधण्यात आले. मान्यवरांनी आमच्या गावाकडे जास्त लक्ष द्यावे अशी विनंती उपसरपंच यांनी केली

गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे म्हणाले की, महाराष्ट्रात औद्योगिक रणामुळे खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे ती भरून काढण्यासाठी वृक्षारोपण करणे व संगोपन करणे गरजेचे आहे. गावात जेवढी झाडे जास्त तेवढे गावातील नागरिकाचे स्वस्थ चांगले राहते असे प्रतिपादन केले. यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी म्हणाले कि पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे तो राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे व त्यापेक्षा ही वृक्षांचे संगोपन करणे जास्त गरजेचे आहे. लातूर जिल्ह्यात वृक्ष खूप कमी प्रमाणत आहेत. त्याची भरपाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावावी लागणार आहेत असे मनोगत व्यक्त केले. जि.प सदस्य माधवराव जाधव म्हणाले की नागझरी हे तीर्थ क्षेत्र गाव आहे. अश्या ठिकाणी झाडे लावणे गरजेचे आहे कारण बाहेरून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येतात. गावचे उपसरपंच उध्दवराव ईप्पर यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे झाडे लावा झाडे जगवा असेही आवाहन केले. कार्यक्रमानिमित्त आलेल्या वरील सर्व मान्यवरांनी ग्रामपंचायतला जेवढे जमेल तेवढे सहकार्य करू असे आश्वासन दिले. कार्यक्रमासाठी कृषीसहायक कलमे, कृषी सहायक नाईक, निराधार समिती सदस्य व्यंकट वंगे, श्याम पाटील, दयानंद पाटील, चंद्रकांत शिंगारे, ग्रामसेवक जगताप, शाळेचे मुखयाध्यापक कुंडगिर, सहशिक्षक राठोड हे उपस्थित होते. सूत्र संचलन प्रा. व्यंकटराव ईप्पर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक कुंडगिर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील तरुण मंडळी व समस्त गावकऱ्यांनी सहकार्य केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!