पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत रोषणाई

पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत रोषणाई

टोकवाडी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण

पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांनी 57 हजारोंचे वीजबिल भरले

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांनी वाढदिवस साजरा करत असताना आपल्याच गावातील विद्यादान देणाऱ्या दालनाची रोषनाई करण्याचे काम केले आहे. थकीत विजबिलामुळे अंधारात असलेल्या शाळेला रोषनाई देत जिल्हा परिषद शाळेची ५७ हजाराचे विजबिल सभापती बालाजी मुंडे यांनी भरले असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपनही केले आहे.

परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुक्रवार दि.09 जुलै रोजी त्यांचे मुळगाव असलेल्या टोकवाडी येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. राजाराम मुंडे, सरपंच सौ.गोदावरी राजाराम मुंडे, महावितरणचे देवकर, ग्रामसेवक क्षीरसागर मँडम, उपसरपंच सुरेश रोडे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम काळे, नामदेव मुंडे, सुनील मुंडे, लहुदास मुंडे, माधवराव मुंडे, मदन काळे, आश्रोबा काळे, भानुदास मुंडे, गंपू पारधे, व सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व कर्मचारी, व ग्रामपंचायत सर्व सदस्य व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सभापती बालाजी मुंडे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. राजाराम मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील परिसरात हायमास्ट बसविण्यात आले आहेत. टोकवाडी येथे सभापती बालाजी मुंडे व डॉ. राजाराम मुंडे यांचे दोघांचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्यांच्या दोघांच्याही कामाचे कौतुकास्पद आहे.
परंतू केवळ सत्कार न घेता बालाजी मुंडे यांनी टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या थकलेल्या विजबिलामुळे अंधारात असलेल्या शाळेला रोषनाई देण्याचे काम केले. तब्बल ५७ हजार रूपयाचे थकीत विजबिल बालाजी मुंडे यांनी भरून ज्ञान दान देणाऱ्या दालनाला रोषनाई देण्याचे काम केले. एवढेच नव्हेतर वृक्षारोपन करून पर्यावरणाचे संगोपन करण्याचा देखील त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने प्रयत्न केला. त्यांच्या या चांगल्या कामाचे कौतूक गावकऱ्यांनी करत बालाजी मुंडे व त्यांच्या पत्नीचा जोरदार सत्कार करत त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक केले. यावेळी गावकऱ्यांसोबत बोलताना बालाजी मुंडे म्हणाले की, मी माझ्या गावाच्या विकासासाठी आणि गावकऱ्यांच्या चांगल्यासाठी सदैव प्रयत्नशिल राहिल. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक कराड यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीला भरभरून निधी आला असून तो निधी सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी खर्च करण्यास पंचायत समितीच्या मार्फत मी सदैव तत्पर राहिल, माझ्या गावात माझा झालेला सत्कार हा मी आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही असे भावनिक उद्गारही त्यांनी यावेळी काढले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!