विलास सिंदगीकर यांचा मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतिने सत्कार

विलास सिंदगीकर यांचा मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतिने सत्कार

अहमदपूर ( गोविंद काळे ) : विलास सिंदगीकर यांचा मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा महाराष्ट्रातील सुप्रसिध्द साहित्यिक विलास सिंदगीकर यांची नुकतीच राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल, आखिल भारतीय मराठी साहित्य महमंडळाचे अध्यक्ष मा. प्राचार्य.कौतिकराव ठाले – पाटील यांच्या शुभहस्ते परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. परिषदेच्या डॉ.ना.गो नांदापुरकर सभागृहात मराठवाडा साहित्य परिषद केंद्रिय कर्यकरणीच्या सर्वसाधारण सभेत आज बुधवार दिनांक 21-7-2021 रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी परिषदेचे कार्यवाह प्रा .डॉ .दादा गोरे,उपाध्यक्ष प्रा.किरण सागर, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके , उदगीर येथील 40 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. ऋषिकेश कांबळे, प्राचार्य कमलाकर कांबळे, माजी प्राचार्य सुरेश जाधव, प्रतिष्ठानचे संपादक तथा जेष्ठ कथाकार आसाराम लोमटे, कवी देविदास फुलारी, कवयित्री संजीवनी तडेगावकर, कथाकार प्रा.भास्कर बडे, मा.दगडु लोमटे, नितीन तावडे, डॉ.रामचंद्र काळुंखे , जीवन कुलकर्णी, हेमलता पाटील यांची उपस्थिती होती. विलास सिंदगीकर हे साहित्याच्या माध्यमातून माय- मराठीची सेवा करत आहेत. त्यांनी साहित्याच्या माध्यमातून ग्रामीण, दलित, आदिवासी , भटक्या विमुक्त समाजाचे दुःख आणि वेदना मोठ्या ताकदीने जगाच्या वेदीवर मांडल्या आहेत. विलास सिंदगीकर हे कथा-कथनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम साहित्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून ते मराठवाडा साहित्य परिषदेसाठी कौतुकाची बाब आहे. आशा शब्दात ठाले पाटील यांनी सिंदगीकर यांचे सत्कराप्रसंगी कौतुक केले. या यशाचे श्रेय मराठी साहित्य रसिक आणि मराठवाडा साहित्य परिषदेलाही जाते. मराठवाडा साहित्य परिषदेने कार्याची दखल घेऊन सत्कार केला त्याबद्धल साहित्य परिषदेच्या रूनात राहू इच्छितो आशा शब्दात सिंदगी यांनी मनोगत व्यक्त केले. साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा.डॉ.दादा गोरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.किरण सगर यांनी केले, तर आभार कुंडलिक अतकरे यांनी मांडले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!