किनगांवच्या महात्मा फुले महाविद्यालयात क्रांती ज्योती साविञीमाई फुले यांना विनम्र अभिवादन

किनगांवच्या महात्मा फुले महाविद्यालयात क्रांती ज्योती साविञीमाई फुले यांना विनम्र अभिवादन

किनगांवात महिला शिक्षण दिनाने जयंती साजरी

किनगांव (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्‍यातील किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ३ जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिनाने उत्साहात सोमवार दि ४ जानेवारी रोजी ठिक 11 वाजता महाविद्यालयात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भारत भदाडे होते तर प्रमुख उपस्थिती प्रा.डॉ. बी. आर बोडके, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.बालाजी आचार्य,गुणवत्ता हमी पक्षाचे समन्वयक प्रा.प्रभाकर स्वामी प्रा.संजय जगताप, प्रा.विठ्ठल चव्हाण प्रा.बळीराम पवार, प्रा.डॉ. विरनाथ हुमनाबादे ,प्रा.अजय फड, प्रा.डॉ दर्शना कानवटे प्रा. पद्मजा हगदळे, प्रा.सदाशिव वरवटे, प्रा. पांडूरंग कांबळे, प्रा. अनंत सोमुसे,कार्यालयीन अधिक्षक गोपाळ इंद्राळे,उमेश जाधव, इंददेव पवार अनिल भदाडे, शिवाजी हुबांड किशन धरणे, आखिल शेख आदीसह रासेयो विद्यार्थीनी कु शितल कचरे, कु अंकिता चावरे, कु. मुसळे, कु गिता पोटफोडे आदि उपस्थित होत्या यावेळी प्राचार्य डॉ.भारत भदाडे यांनी क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन पुष्पहाराने करून विनम्र अभिवान केले यावेळी प्रस्ताविक करताना प्रा.बालाजी आचार्य म्हणाले की, सामाजीक क्रांतीच्या अग्रदूत सावित्रीमाई यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेताना स्त्री शिक्षणाची मुहर्तमेढ सावित्रीमाई फुलेनी रोवली म्हणून आज मुली उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान होत आहेत यांचे सर्वश्रेय सावित्रीमाईलाच आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संजय जगताप यांनी केले तर शेवटी आभार रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा बालाजी आचार्य यांनी मानले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!