माजी मंत्री तथा चेअरमन दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते पर्यावरण दिनानिमित्त मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात वृक्षारोपण संपन्न

0
माजी मंत्री तथा चेअरमन दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते पर्यावरण दिनानिमित्त मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात वृक्षारोपण संपन्न

लातूर (एल पी उगिले)
राज्यात नावलौकिक असलेल्या विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या चालु गाळप हंगामासाठी मिल रोलरचे पूजन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते, राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण मंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कऱण्यात आले.
त्यानंतर संचालक मंडळाची चालू गळीत हंगाम आढावा बैठक संपन्न झाली. पर्यावरण दिन निमीत्त कारखाना परिसरात वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
चालु गाळप हंगामात ९ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ठ,चालू गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी केली जात असून मांजरा कारखान्याने आज पर्यतचे सर्व गळीत हंगाम यशस्वी केले आहेत.त्यानुसार येणारा गळीत हंगाम देखील यशस्वी करून ऊस उत्पादकां चा ऊस वेळेवर गाळप केला जावा. यासाठी यंत्रणा सज्ज होत असुन येणाऱ्या गाळप हंगामामध्ये कारखान्याने 9 लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गाळपास येणाऱ्या उसाची तोड 100% हार्वेस्टरद्वारे करण्यात येणार आहे. कारखाना मालकीचे सध्या 8 हार्वेस्टर उपलब्ध असून येणाऱ्या हंगामासाठी आणखीन कारखाना मालकीचे 17 हार्वेस्टर घेण्याचा निर्णय मांजरा साखर कारखान्याने घेतला असुन 100% हार्वेस्टर द्वारे ऊसतोड करणार आहे. कारखाना मालकीचे एकूण 25 हार्वेस्टर व कारखाना हमीवर लातूर जिल्हा बँके मार्फत दिलेले 43 हार्वेस्टर व इतर हार्वेस्टर असे एकूण 80 हार्वेस्टर द्वारे ऊसतोड करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली.
पर्यावरण दिनानिमित्ताने कारखान्यावर वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने कारखान्यावर माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ. अमित विलासरावजी देशमुख व संचालक मंडळ मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरनाच्या रक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असून प्रत्येकानी आपापल्या परीने वृक्षाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत, असे मनोगत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव,ट्वेंटी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील, मांजरा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन अशोकराव काळे, कारखान्याचे संचालक श्रीशैल उटगे,मदन भिसे, नवनाथ काळे, वसंत उफाडे, धनराज दाताळ, तात्यासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर पवार, भैरू कदम, सदाशिव कदम, निळकंठ बचाटे, सचिन शिंदे, दयानंद बिडवे, बालाजी पांढरे,अनिल दरकसे विलास चामले, अरुण कापरे, कार्यकारी संचालक पंडीत देसाई, माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, सचिन दाताळ, इंदिरा सूतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब कदम, विकास देशमुख,कारखान्याचे खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी कामगार आदींची उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!