महापुरुषांचे विचार कालसुसंगत असतात – धनंजय गुडसूरकर

महापुरुषांचे विचार कालसुसंगत असतात - धनंजय गुडसूरकर

उदगीर (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक – अण्णाभाऊ साठे हे महापुरुष सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जागृतीचे कार्य करणारे होते. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर केलेले कार्य व निर्माण केलेल्या साहित्यकृती या आजही कालसुसंगत आहेत. लोकमान्य टिळकांनी दिलेले सामाजिक व राजकीय भान आणि अण्णाभाऊ साठे यांनी दीनदलित वंचितामध्ये केलेली जनजागृती आजही महत्त्वपूर्ण आहे. महापुरूषांचे विचार हे विशिष्ट काळापुरते मर्यादित नसून ते कालसुसंगत आहेत, असे मत महाराष्ट्र साहित्य-संस्कृती मंडळ सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील दिनविशेष समिती व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर म. ए. संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के (व.म.), उपप्राचार्य प्रा. आर. एन. जाधव ( क.म.) यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना गुडसूरकर म्हणाले, स्वातंत्र्य आंदोलनात टिळकांनी लेखणी व वाणीच्या माध्यमातून देशसेवेसाठी केलेली आंदोलने अजरामर आहेत तसेच अण्णाभाऊ साठे यांनी कथा – कादंबरी व लोकनाट्याच्या माध्यमातून केलेले लोकप्रबोधन आजही दिशादर्शक आहे. अण्णाभाऊंचे साहित्य आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. तत्वांसाठी जीवाची बाजी लावणारे, बंडखोरी करणारे, धाडसी, करारी व स्वाभिमानी पात्रं अण्णाभाऊंनी साहित्यातून उभी केली. यावेळी बोलताना बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, देशाला विकसित करणारा विचार महापुरुषांनी दिला तसेच सामाजिक वंचितांचा हुंकार साहित्यातून मांडण्याचे कार्य अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. आर. के. मस्के यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनविशेष समिती प्रमुख डॉ. दीपक चिद्दरवार यांनी तर आभार डॉ. अर्चना मोरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!