प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निलोफर शेख पूर्ण ताकतीने लढतील – शहाजहान शेख

0
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निलोफर शेख पूर्ण ताकतीने लढतील - शहाजहान शेख

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्ष आपापले अस्तित्व राखण्यासाठी धडपडत आहेत. त्या स्पर्धेमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी निलोफर शहाजहान शेख यांना उमेदवारी दिलेली आहे. त्या या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकतीने लढतील आणि जिंकतील असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शहाजहान शेख यांनी व्यक्त केला आहे.
उदगीर शहरातील भोसले कॉम्प्लेक्स मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंग, रवी बेळकुंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बिरादार ताई यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार उपस्थित होते.
सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी लढा देणे हे बच्चू कडू यांचे ध्येय आहे. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही देखील उदगीर शहरातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. केवळ जनतेच्या पाठिंबावरच प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आपण उमेदवार उभे केले आहेत. त्यांना जनतेने भरभरून प्रेम द्यावे. एका बाजूला धनशक्ती चा लढा आहे, तर दुसऱ्या बाजूला हा जनशक्तीचा लढा ठरेल, पारंपरिक राजकीय पक्षाचे उमेदवार आज पैशाचा पाऊस पडतील मात्र उद्या सर्वसामान्य माणसाला कोणीही विचारणार नाही. गेल्या कित्येक वर्षापासून उदगीरच्या विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. विस्तारित झालेल्या शहरातील नागरिकांना या गोष्टीचे दुःख प्रामुख्याने जाणवते आहे. कित्येक प्रभागामध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. या सर्व गोष्टीचा आम्ही अभ्यास केला असून आम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यासाठीच प्रहार जनशक्ती पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांचे समाजकार्य डोळ्यासमोर ठेवून प्रहारचा प्रत्येक सैनिक काम करतो आहे. सर्वसामान्य माणूस आणि दिव्यांगांसाठी या पक्षाने केलेले कार्य उल्लेखनीय आहे. याची जाणीव ठेवून उदगीरकरांनी या वेळेस प्रहार जनशक्ती पक्षाला संधी द्यावी. असेही आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शहाजहान शेख यांनी याप्रसंगी केले आहे. पत्रकार परिषदेच्या आभार प्रदर्शन रवी बेळकुंदे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!